आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा पोलिसांना आदेश

धुबडी (आसाम) – पाकिस्तानी आतंकवादी आले आणि त्यांनी निष्पाप लोकांना मारले; पण आपल्यातील काही लोक ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणत आहेत. आम्ही त्यांपैकी अनेकांना अटक केली आहे. जर कुणी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे म्हटले, तर आम्ही त्याचे पाय तोडू, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले आहे. येथील एका सभेत ते बोलत होते.
Who ever dares to chant Pakistan Zindabad in Assam will face dire consequences pic.twitter.com/jc40sUROlr
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) May 2, 2025
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, मी पोलिसांना ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणार्यांचे चेहरे पाहू नका, त्यांना कायद्यानुसार अटक करा आणि त्यांचे पाय तोडा’, असे निर्देश दिले आहेत. आपल्याला आपला आसाम आणि भारत भक्कम करायचा आहे. भारताचे खातात आणि पाकिस्तानची स्तुती करतात, अशा लोकांची आपल्याला आवश्यकता नाही.
Assam CM Himanta Biswa Sarma: 'Take Strongest Legal Action Against Pro-Pakistan Sloganeers' 🚨
Following the #PahalgamTerrroristAttack, 36+ individuals have been arrested for defending Pakistan in Assam. 🇮🇳 🇵🇰
⚖️ There must be a law allowing swift, severe punishment — up to… pic.twitter.com/fkAyD9syds
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2025
संपादकीय भूमिकाअशा देशद्रोह्यांना फाशीच देण्याचा कायदा केला पाहिजे आणि त्याची कार्यवाही काही दिवसांतच झाली पाहिजे ! |