Assam CM Himanta Biswa Sarma : ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणार्‍यांचे पाय तोडा !

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा पोलिसांना आदेश

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

धुबडी (आसाम) – पाकिस्तानी आतंकवादी आले आणि त्यांनी निष्पाप लोकांना मारले; पण आपल्यातील काही लोक ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणत आहेत. आम्ही त्यांपैकी अनेकांना अटक केली आहे. जर कुणी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ असे म्हटले, तर आम्ही त्याचे पाय तोडू, असे विधान आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले आहे. येथील एका सभेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, मी पोलिसांना ‘पाकिस्तान जिंदाबाद’ म्हणणार्‍यांचे चेहरे पाहू नका, त्यांना कायद्यानुसार अटक करा आणि त्यांचे पाय तोडा’, असे निर्देश दिले आहेत. आपल्याला आपला आसाम आणि भारत भक्कम करायचा आहे. भारताचे खातात आणि पाकिस्तानची स्तुती करतात, अशा लोकांची आपल्याला आवश्यकता नाही.

संपादकीय भूमिका  

अशा देशद्रोह्यांना फाशीच देण्याचा कायदा केला पाहिजे आणि त्याची कार्यवाही काही दिवसांतच झाली पाहिजे !