पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा दिली धमकी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर भारताने सिंधु नदीवर कोणतेही धरण बांधले, तर पाकिस्तान त्यावर आक्रमण करील. आक्रमकता केवळ गोळ्यांद्वारे दाखवली जात नाही, तर पाणी अडवणे हेही एक आक्रमण आहे, अशी धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते.
🇵🇰 Pakistan's Defence Minister Khawaja Asif threatens:
"If India builds a dam on the Indus, we will attack!" 💣🌊Yet another empty threat? 🤔
Let’s see if Pakistan dares. The response they'd face might wipe them off the map. 🇮🇳💥#IndusRiver #IndiaPakistanWar
VC:… pic.twitter.com/q5oAZSxM4a— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 3, 2025
ख्वाजा आसिफ यांनी दावा केला की, भारताचे आरोप आंतरराष्ट्रीय समुदायाने फेटाळले आहेत. मोदी सरकारकडे त्यांचे दावे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. (मनोराज्यात रमणारे पाकचे मंत्री ! अशी विधाने पाकच्या अज्ञानी आणि गांवढळ नागरिकांना खुश करण्यासाठी असली, तरी जगाच्या दृष्टीने ती हास्यास्पद आहेत ! – संपादक)
संपादकीय भूमिकापाकिस्तानने असे धाडस करून पहावे, त्याला त्याचे प्रत्युत्तर जे मिळले, त्याद्वारे पाकिस्तानच शिल्लक रहाणार नाही ! |