(म्हणे) ‘भारताने सिंधु नदीवर धरण बांधले, तर आम्ही त्यावर आक्रमण करू !’ – Pakistan’s Defence Minister Threatens

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा दिली धमकी

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर भारताने सिंधु नदीवर कोणतेही धरण बांधले, तर पाकिस्तान त्यावर आक्रमण करील. आक्रमकता केवळ गोळ्यांद्वारे दाखवली जात नाही, तर पाणी अडवणे हेही एक आक्रमण आहे, अशी धमकी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुन्हा एकदा दिली आहे. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना बोलत होते.

ख्वाजा आसिफ यांनी दावा केला की, भारताचे आरोप आंतरराष्ट्रीय समुदायाने फेटाळले आहेत. मोदी सरकारकडे त्यांचे दावे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे नाहीत. (मनोराज्यात रमणारे पाकचे मंत्री ! अशी विधाने पाकच्या अज्ञानी आणि गांवढळ नागरिकांना खुश करण्यासाठी असली, तरी जगाच्या दृष्टीने ती हास्यास्पद आहेत ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

पाकिस्तानने असे धाडस करून पहावे, त्याला त्याचे प्रत्युत्तर जे मिळले, त्याद्वारे पाकिस्तानच शिल्लक रहाणार नाही !