रांगोळी पुसल्यावरून मुलाला मारहाण !
पुणे – रांगोळी पुसली गेल्याच्या कारणावरून कारखान्याच्या सुरक्षारक्षकांनी एका मुलाला पुष्कळ मारहाण केली. या प्रकरणी सुरक्षारक्षकाविरोधात गुन्हा नोंद करण्याची मागणी होत आहे. सायकल चालवत असतांना त्याच्याकडून श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यासमोरील रांगोळी पुसली गेली.
संपादकीय भूमिका : संयम गमावलेली सध्याच्या काळातील माणसे !
रुग्णवाहिकेअभावी बालक-महिलेचा मृत्यू
डहाणू (पालघर) – वेळेत उपचार न मिळाल्याने नवजात बालक आणि माता या दोघांनाही प्राण गमवावे लागले आहेत. कैनार बाटुपाडा येथे रहाणार्या महिलेला प्रसुतीनंतर प्रकृती गंभीर झाल्याने कॉटेज ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी बलसाड येथे हालवण्यास सांगितले; मात्र १०८ क्रमांक फिरवल्यावर येणारी रुग्णवाहिका ५ घंटे विलंबाने आल्याने अधिक रक्तस्राव होऊन या २५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. रुग्णवाहिका लवकर येण्यासाठी नातेवाईक आधुनिक वैद्यांना वारंवार विनंती करत होते.
संपादकीय भूमिका : स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर ही स्थिती लज्जास्पद !
‘जलजीवन मिशन’चे तीन तेरा !
मोखाडा (जिल्हा ठाणे) – येथे कुंडाचा पाडा गावा १८५ नळजोडण्या देण्यात आल्या आहेत; मात्र केवळ २० नळांनाच पाणी येत आहे. त्यामुळे महिलांना रणरणत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ‘हर घर नलसे जल’ या योजनेअंतर्गत या जोडण्या देण्यात आल्या आहेत. जलजीवन मिशनची कामे न झाल्याने या नळांना पाणीच येत नाही. उपअभियंत्यांनी ‘गावकर्यांना विहिरीतून पाणी दिले जाईल’, असे म्हटले आहे.
संपादकीय भूमिका : स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !
रस्ते काँक्रिटीकरणात भ्रष्टाचाराचा संशय !
कल्याण-डोंबिवली – येथील रस्ते काँक्रिटीकरणासाठी ३५० कोटींहून अधिक निधी शासनाने देऊनही कामे निकृष्ट आणि अर्धवट होत आहेत. मनमानी पद्धतीने पैशांची उधळपट्टी चालू आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी उद्धव गट पक्षाने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे केली आहे.
संपादकीय भूमिका : सर्वत्र भ्रष्टाचाराची बजबजपुरी !
समृद्धी महामार्गामुळे गेलेल्या भूमीचा मोबदला नाही !
शहापूर (जिल्हा ठाणे) – अंदाड या गावी समृद्धी महामार्गाच्या अंतर्गत सरकारने घेतलेली शेतकर्यांच्या भूमीच्या बदल्यात त्यांना एकही पैसा मिळालेला नसल्याने शेतकर्यांनी महामार्ग अडवून आंदोलन केले. मोबदला न मिळाल्यास मोठे आंदोलन करण्याची चेतावणी शेतकर्यांनी दिली आहे. सरकारी कार्यालयात खेटे मारून २ शेतकर्यांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे यापुढे शेतकर्यांनी उपोषण करण्याचे ठरवले आहे.
संपादकीय भूमिका : भूमी दिलेल्या शेतकर्यांवर अन्याय का ?