|

जळगाव – येथील तालुक्यातील किनोद येथील २६ वर्षांच्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आत्महत्या केली नसून तिची सासू आणि नणंद यांनी तिची हत्या केल्याचा आरोप गायत्रीच्या आईने केला आहे. गायत्रीच्या पश्चात पती आणि मुले आहेत. ती शिवणकाम करत होती. ‘मासिक पाळी आल्यावरही तिने स्वयंपाक केल्याने त्या दोघांनी गायत्रीला मारहाण करून जीव घेतला’, असा आरोप होत आहे.
‘मासिक पाळीच्या काळात केलेला स्वयंपाक सासरी चालत नसल्याने वाद झाला होता. वाद विकोपाला गेल्याने सासू आणि नणंद यांनी तिचा गळा दाबून खून केला अन् नंतर आत्महत्या केल्याचा बनाव करत गळ्यात साडी बांधून तिला लटकवले’, असे नातेवाइकांनी सांगितले. ‘सासरच्या दोषींवर गुन्हा होईपर्यंत मृतदेह कह्यात घेणार नाही’, असा पवित्रा मृत गायत्रीच्या माहेरच्या कुटुंबियांनी घेतला होता.