
मुंबई – गेल्या वर्षभरात मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष बाल साहाय्य कक्षाने ८७ बालमजुरांची सुटका केली. यात उत्तरप्रदेश आणि बिहार येथील मुलांची संख्या अधिक आहे. गोवंडीत टोपीच्या कारखान्यावर धाड घालून २ अल्पवयीन मुलांची सुटका केली. कारखान्याचा मालक महंमद शेख याला कह्यात घेऊन त्याला सोडले.