रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती अलका वाघमारे यांच्यामध्ये त्यांच्या मुलाला जाणवलेले आध्यात्मिक स्तरावरील पालट !

श्रीमती अलका वाघमारे

१. ‘आईच्या बोलण्यातून चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, अशी अनुभूती येणे  

‘२४.१.२०२५ या दिवशी मी माझ्या आईशी (श्रीमती अलका वाघमारे (वय ६७ वर्षे) यांच्याशी) बोलत होतो. आम्ही बोलत असतांना मध्येच साधनेचा विषय निघाल्यावर आई मला प्रार्थना आणि कृतज्ञता यांविषयी सांगू लागली. तिचे बोलणे ऐकत असतांना ‘माझ्याकडे मोठ्या प्रमाणात चैतन्य येत आहे’, असे मला जाणवू लागले. ‘एखाद्या देवतेच्या नामजपातील चैतन्यामुळे मला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीवर जसा परिणाम होतो, तसाच परिणाम आईच्या बोलण्यातील चैतन्यामुळे मला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीवर होत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझे डोके बधिर झाले. मला ऐकू येणे हळूहळू न्यून होऊ लागले. मला तिच्या बोलण्याला प्रतिसाद देता येईना. शेवटी एका टप्प्याला मी तिला बोलणे थांबवायला सांगितले. वर्ष २००५ मध्ये आई आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांसाठी नामजपादी उपाय करत होती. ‘आता आईमध्ये पूर्वीसारखी आध्यात्मिक क्षमता निर्माण झाली आहे’, असे मला या प्रसंगातून लक्षात आले.

श्री. धैवत वाघमारे

२. आईमध्ये जाणवलेले अन्य पालट

अ. पूर्वी आई मला प्रयत्न करण्याविषयी सांगत असतांना मला तिचे बोलणे वरवरचे वाटायचे. ‘आज ती अंतरंगापासून बोलत आहे’, असे मला जाणवले. ‘ती स्वतः प्रयत्न केल्यानुसार अनुभूती घेत आहे’, असे मला जाणवत होते.

आ. पूर्वी ती मला प्रयत्न करायला सांगायची. त्या वेळी ‘आई’ या नात्याने तिच्या माझ्याकडून पुष्कळ अपेक्षा असत. आता ‘ती एक ‘साधक’ या नात्याने माझ्याशी बोलत आहे’, असे मला जाणवले. तिच्या बोलण्यात निरपेक्षता जाणवत होती.

इ. ती साधनेत येण्यापूर्वी घरी देवीची आरती करतांना, देवाविषयीचे चित्रण पहातांना, तसेच साधनेत आल्यापासून श्री गुरूंचा विषय निघाला की, तिच्या डोळ्यांतून अश्रूधारा वहात असत. त्यावर तिचे नियंत्रण रहात नसे. ‘आता तिच्या बोलण्यातूनच भाव व्यक्त होत आहे. आता तिला भावाश्रूंची आवश्यकता राहिली नाही’, असे मला जाणवले.

‘भगवंताने मला आईमधील पालट अनुभवण्याची संधी दिली’, त्याबद्दल मी त्याच्या चरणी कृतज्ञ आहे. ‘आईची आध्यात्मिक वाटचाल गुरुकृपेने पूर्णत्वास जावो’, अशी श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. धैवत विलास वाघमारे (श्रीमती वाघमारे यांचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.१.२०२५)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक