Taslima Nasreen : महंमद युनूस यांना देण्यात आलेला नोबेल पुरस्कार काढून घ्या !

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांची नोबेल समितीकडे पत्र लिहून मागणी

बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार महंमद युनूस यांनी शांततेसाठी काहीही केलेले नाही. उलट त्यांनी बांगलादेशात हिंसाचार आणि अशांतता पसरवली आहे. अशा परिस्थितीत त्यांना देण्यात आलेला नोबेल पुरस्कार परत घेतला पाहिजे, अशी मागणी बांगलादेशाच्या प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांनी नोबेल शांतता पुरस्कार देणार्‍या नॉर्वे येथील समितीला पत्र लिहून केली आहे.

१. नसरीन यांनी पत्रात म्हटले आहे की, मला ठाऊक आहे की, एकदा नोबेल शांतता पुरस्कार मिळाला की, तो परत घेता येत नाही; पण युनूस यांचे प्रकरण वेगळे आहे. त्यांच्या कृती पहाता ते कदाचित् हा पुरस्कार राखून ठेवू शकणार नाहीत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता, माझ्या विनंतीचा विचार केला पाहिजे आणि पुरस्कार मागे घ्यावा.

२. नसरीन यांनी युनूस यांच्यावर ते ग्रामीण बँकेत असतांना कर चुकवल्याचा आरोप केला आहे. जेव्हा काही महिला व्याजासह सूक्ष्म कर्ज फेडू शकल्या नाहीत, तेव्हा ग्रामीण बँकेच्या कर्मचार्‍यांनी त्यांची घरे पाडली. अशा व्यक्तीला शांतीचे प्रतीक कसे मानले जाऊ शकते ? असा प्रश्न नसरीन यांनी उपस्थित केला आहे.

युनूस यांनी घडवल्या हिंदूंच्या हत्या

नसरीन म्हणाल्या की, युनूस यांनी आतंकवादी गटांशी हातमिळवणी करून बांगलादेशात बेकायदेशीरपणे सत्ता मिळवली आहे. सत्ता हस्तगत केल्यानंतर गेल्या ९ महिन्यांत त्यांच्या आदेशावरून विरोधी पक्षातील सदस्यांची आणि अल्पसंख्यांक हिंदूंची हत्या करण्यात आली आहे. त्यांची घरे जाळली गेली आहेत आणि उद्ध्वस्त केली गेली आहेत. अनेक लोकांना खोट्या आरोपाखाली कारागृहात टाकण्यात आले आहे. युनूस शेजारी देश भारताविरुद्ध युद्धाची सिद्धता करत आहेत. बांगलादेशाकडे भारताविरुद्ध युद्ध लढण्याची क्षमताही नाही. असे असूनही युनूस देशातील लाखो लोकांचा मृत्यू घडवू शकतात.


पाकिस्तानकडून बांगलादेशात भारताविरोधात कट

ईशान्य भारतात फुटीरतावाद्यांना शस्त्रपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न

ढाका (बांगलादेश) – येथील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयात आय.एस्.आय.चे हस्तक भारतविरोधी कट रचत आहेत. बांगलादेशातील पाकिस्तानचे उच्चायुक्त सय्यद अहमद मारुफ यांनी जमात, हेफाजत आणि खिलाफत मजलिस या इस्लामी कट्टरतावादी संघटनांशी दोनदा गुप्त बैठका घेतल्या आहेत. पाकचा उद्देश ईशान्येकडील राज्यांमधील फुटीरतावाद्यांना शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढवणे आणि त्यांना घुसखोरी करण्यास प्रवृत्त करणे आहे. (भारताने आता वर्ष १९७१ प्रमाणेच पश्चिम आणि पूर्व सीमेवर कारवाई करून पाकिस्तान आणि आताचा बांगलादेश यांना धडा शिकवून त्यांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे  ! – संपादक)

संपादकीय भूमिका

भारतातील किंवा बांगलादेशातील हिंदूंनी अथवा हिंदु संघटनांनी अशी मागणी का केली नाही ? आतातरी ते मागणी करतील का ?