पहलगाम आतंकवादी आक्रमणाचे पडसाद
वृंदावन (उत्तरप्रदेश) – वृंदावनमधील प्रसिद्ध बांके बिहारी मंदिराने मुसलमान दुकानदारांसमवेत व्यवसाय करणे थांबवावे, अशी मागणी हिंदु संघटनांनी केली आहे. पहलगाम आतंकवादी आक्रमणानंतर काही िहंदु संघटनांनी वृंदावन आणि मथुरा येथे निदर्शने केली. या संघटनांनी हिंदु यात्रेकरू आणि हिंदु दुकानदार यांना मुसलमान समुदायाशी व्यवहार न करण्याचे आवाहन केले. यासह मुसलमान दुकानदारांना त्यांच्या दुकानांवर मालकाचे नाव लिहिण्यास सांगण्यात आले.
‘काशी विद्वत परिषदे’चे सदस्य नागेंद्र महाराज यांनी हिंदु दुकानदारांना ‘मुसलमान समुदायासमवेत व्यवसाय करू नका आणि त्या समुदायातील लोकांना नोकर्या देऊ नका’ असे आवाहन केले आहे.
मागणी व्यावहारिकदृष्ट्या अयोग्य ! – मंदिर व्यवस्थापन समितीबांके बिहारी मंदिर व्यवस्थापनाने ही मागणी स्पष्टपणे नाकारली आहे. मंदिराचे पुजारी आणि मंदिर व्यवस्थापन समिती यांनी ही मागणी व्यावहारिकदृष्ट्या अयोग्य असल्याचे म्हटले आहे. मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य ज्ञानेंद्र किशोर गोस्वामी म्हणाले की, वृंदावनमध्ये हिंदु आणि मुसलमान वर्षानुवर्षे शांततेत अन् बंधूभावाने रहात आहेत. मुसलमान कारागीर आणि विणकर बांके बिहारींसाठी कपडे विणतात. देवतेसाठी मुकुट आणि बांगड्या यांसारख्या वस्तूदेखील मुसलमान कारागीर बनवतात. अनेक मुसलमान भाविकही मंदिरात दर्शनासाठी येतात. |