ठाणे येथे अमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी अटकेत !

२ कोटी ३० लाख ४९ सहस्र ६०० रुपयांचा साठा जप्त

अमली पदार्थांचा साठा जप्त

ठाणे – पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने एमडी या अमली पदार्थाचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. हा कारखाना एका कपड्याच्या दुकानातील गाळ्यामध्ये चालू होता.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुंब्रा परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी आलेला देवेश शर्मा याला कह्यात घेतले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी कारखाना चालवणारा महंमद कय्युम महंमद युनुस हाशमी (वय ४५ वर्षे), बिपीन पटेल (वय ४९ वर्षे) आणि देवेश शर्मा (वय ३२ वर्षे) यांना अटक केली असून त्यांच्याकडून २ कोटी ३० लाख ४९ सहस्र ६०० रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

संपादकीय भूमिका

समाजाला व्यसनाधीन करणार्‍यांना कारागृहातच डांबायला हवे !