(म्हणे) ‘पहलगामवरील आक्रमणात जात, पात, धर्म या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत !’ – शरद पवार

शरद पवार

ठाणे – ठाकरे  कुटुंब एकत्र येत असतील, तर चांगली गोष्ट आहे. पहलगामवरचे आक्रमण हे देशावरचे आक्रमण असल्याने यात धर्म, जात, पात, भाषा या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत. देशवासीय म्हणून कशाचीही अपेक्षा न करता आपल्याला एकत्र यावे लागेल. देशाचे पंतप्रधान आणि अन्य सहकारी जी उपाययोजना करतील, त्याला आमचा पाठिंबा राहील, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते ठाणे येथे त्यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बांधलेल्या प्रती तुळजापूर मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी आले होते.

संपादकीय भूमिका :

धर्म विचारूनच हिंदूंना संपवण्यासाठीच आतंकवाद्यांनी आक्रमण केल्याने ‘यात धर्म महत्त्वाचा नाही’, असे पवार यांच्यासारखे नेते पुनःपुन्हा सांगून काय साध्य करू पहात आहेत ? राष्ट्राच्या संकटकाळातही पवार मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचे सोडत नाहीत, हे लक्षात घ्या !