
डिचोली, १ मे (वार्ता.) – पहलगाम येथे आतंकवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य केल्याची घटना घडल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कधीही युद्ध भडकण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यात अवैधरित्या वास्तव्य करणारे बांगलादेशी किंवा पाकिस्तानी नागरिक यांचा शोध घेण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना सध्या अनेक ठिकाणी सक्रीय झाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी १ मे या दिवशी डिचोली बाजार परिसरात व्यापार्यांचे ओळखपत्र पडताळण्याची मोहीम राबवली. याविषयी अधिक माहिती देतांना श्री. गोविंद चोडणकर म्हणाले, ‘‘अंदाजे ४५ मिनिटे आम्ही बाजारात अनेक व्यापार्यांना त्यांचे ओळखपत्र विचारले; मात्र अनेकांकडे ओळखपत्र नव्हते.
ओळखपत्र नसलेले व्यापारी भारतीय आहेत कि नाही, हे कसे ओळखणार ? व्यवसाय करणार्यांनी त्यांचे ओळखपत्र समवेत ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने अवैध वास्तव्य करणार्यांना शोधून काढून त्यांच्याविषयीची माहिती पोलीस किंवा प्रशासन यांना द्यावी.’’