सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांच्या खोलीत डिसेंबर २०२४ पासून उष्णता जाणवत होती. जानेवारी २०२५ मध्ये ही उष्णता पुष्कळ वाढली. याविषयी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि सहकारी यांनी याविषयी संशोधन केले. या संशोधनातील खोलीतील भिंती, लादी यांची सूत्रे १ मे या दिवशी पाहिली. आज पुढील भाग येथे दिला आहे.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/908902.html

२. जानेवारी २०२५ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांच्या खोलीतील उष्णतेच्या संदर्भात त्यांना स्वतःला आणि साधकांना आलेल्या अनुभूती
२ आ १ इ. सोफा आणि लाकडी कपाट
१. सोफा थोडा उष्ण जाणवला. त्याच्या तुलनेत लाकडी कपाट जास्त उष्ण जाणवले.
२ आ १ ई. गादी, पांघरूण आणि खोलीतील खिडक्यांचे चार पडदे
१. गादी आणि पांघरूण उबदार जाणवले.
२. गादी आणि पांघरूण यांच्या तुलनेत पडदे अधिक उष्ण जाणवले.

२ आ १ उ. आज खोलीत अन्य वस्तूंच्या तुलनेत गुरुदेवांच्या पलंगावर उठण्या-बसण्याच्या जागेवरील लादी अधिक उष्ण होती.
२ आ १ ऊ. गुरुदेवांच्या चरणांसमोर १६ फूट अंतरापर्यंत साधकांनी त्यांचा तळहात धरल्यावर त्यांना उष्णता जाणवणे आणि ‘तळहात त्यांच्याकडे खेचला जाणे किंवा तळहात मागे ढकलला जाणे’, यांचीही अनुभूती त्यांना येणे : गुरुदेव पलंगावर पहुडले असतांना आम्ही त्यांच्या उजव्या चरणापासून ३ फूट अंतरावर आमचा तळहात धरल्यावर आम्हाला तळहात मागे ढकलल्यासारखा जाणवत होता. गुरुदेव पलंगावर पहुडले असतांना उष्णता बघण्यासाठी यांच्या चरणांसमोरची जागा पुढे भिंत असल्यामुळे अल्प पडत होती. त्यामुळे गुरुदेवांनी खोलीत आसंदीत (खुर्चीत) बसून त्यांचे तळपाय आमच्या समोर येतील अशा स्थितीत सुमारे २ फूट उंचीच्या टेबलावर ठेवले. या स्थितीत त्यांच्या चरणांसमोर साधारण १६ फूट अंतरापर्यंत आम्ही आमचा तळहात धरल्यावर आम्हाला आमच्या तळहाताला उष्णता जाणवत होती, तसेच ‘आमचा तळहात दूर असल्यावर त्यांच्या चरणाकडे खेचला जाणे किंवा जवळ असल्यास तळहात मागे ढकलला जाणे’, यांचीही अनुभूती आम्हाला आली.’
– श्री. भानु पुराणिक (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि श्री. अमित डगवार (८.१.२०२५)
३. गुरुदेवांना २५.२.२०२५ या दिवशी, म्हणजे अमावास्येच्या २ दिवस आधी सायंकाळपासून त्यांच्या तळपायांना जाणवू लागलेला उष्णतेचा त्रास रात्री सहन न होण्याइतका वाढणे
‘दिवसभरात पलंगावर पडून वाचन करतांना माझे तळपाय खोलीच्या पश्चिमेकडील भिंतीकडे असतात. २५.२.२०२५ या दिवशी मला दिवसभरात तळपायांना उष्णता जाणवली नाही. संध्याकाळी ७.३० नंतर मला माझ्या तळपायांना उष्णता जाणवू लागली. तिचे प्रमाण थोडे-थोडे वाढत गेले. रात्री ८ वाजता ती उष्णता तळपायांना सहन न होण्याइतकी वाढली. रात्री ९ वाजता त्या गरमीच्या चटक्यांमुळे पाय भिंतीकडे करणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे माझे पाय आपोआप गुडघ्यांमधून वाकून तळपाय गादीला टेकवले जात होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२५.२.२०२५)
(‘२७.२.२०२५ या दिवशी अमावास्या होती. अमावास्येच्या दिवशी अनिष्ट शक्ती एरव्हीच्या तुलनेत पुष्कळ अधिक प्रमाणात कार्यरत असतात. साधकांना तर बहुतेक वेळा असे अनुभवायला येते की, अमावास्येच्या २ दिवस आधीपासूनच अनिष्ट शक्तींचा त्रास जाणवू लागला आहे. गुरुदेवांनाही तीच अनुभूती आली. २५.२.२०२५ या दिवशी, म्हणजे अमावास्येच्या २ दिवस आधी सायंकाळपासून त्यांच्या तळपायांना उष्णता जाणवू लागली. सायंकाळी अनिष्ट शक्ती कार्यरत होण्यास आरंभ होतो. गुरुदेवांच्या तळपायांना उष्णता जाणवण्याचे कारण म्हणजे त्यांच्या चरणांकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य आणि वातावरणातील अनिष्ट शक्तींची त्रासदायक शक्ती यांच्यात चाललेले सूक्ष्मातील युद्ध ! या युद्धामुळे गुरुदेवांना त्यांच्या तळपायांना उष्णता जाणवू लागली आणि रात्री तिचे प्रमाण सहन न होण्याइतके वाढले.’ – संकलक) (क्रमश:)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/909616.html
|