सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने परशुराम जयंतीच्या निमित्ताने पालखी मिरवणूक !

परशुराम जयंतीच्या निमित्ताने सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने काढण्यात आलेली पालखी मिवणूक !

कोल्हापूर – ब्राह्मण सभा करवीर (मंगलधाम), कोल्हापूर चित्पावन संघ, कर्‍हाडे ब्राह्मण संघाच्या वतीने भगवान परशुराम जयंती, शिवजयंती सोहळा यंदा काश्मीर आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. प्रथेनुसार बिनखांबी गणेश मंदिर येथे फुलांनी सजवलेल्या पालखीत श्री परशुरामांच्या पादुका, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. प्रारंभी डॉ. नंदकुमार जोशी आणि डॉ. राधिका जोशी यांच्या हस्ते पालखीपूजन करण्यात आले. शहरातील विविध मार्गांवरून जाऊन पालखी परत मंगलधाम येथे पोचली. यानंतर श्रींचा जन्मकाळ सोहळा पार पडला.

काश्मीर येथे आतंकवाद्यांनी आक्रमण केल्याने २७ निरपराध लोकांना प्राण गमवावे लागले, याचा निषेध या सोहळ्यात करण्यात आला. या प्रसंगी पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या, तसेच निषेधाचे फलकही लावण्यात आले होते.