ज्या काळात अर्धसत्य, तसेच राजकीय किंवा सामाजिक पालट घडवून आणण्यासाठी केली जाणारी वरवरची कार्ये आणि सामाजिक माध्यमांकडून केली जाणारी नित्य दिशाभूल यांचा दाट अंधार पसरलेला आहे, अशा सध्याच्या काळात सुश्री (कु.) डॉ. वैदेही ताम्हण हे नाव सर्वत्र एका तेजस्वी प्रकाशाप्रमाणे कार्य करत आहे. त्यांचे संपूर्ण कार्य निर्भय, खंबीर आणि हेतूपूर्ण आहे. सुश्री वैदेही यांचा जन्म तेलंगाणा राज्यातील ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे संपूर्ण जीवन तपस्या, सेवा आणि अध्यात्म यांचा एक पवित्र धागा आहे. त्या केवळ एक पत्रकार, समाजसुधारक अथवा उपचार करणार्या (हिलर) नाहीत; तर त्या एक अद्भुत व्यक्तीमत्त्व आहेत. धर्मरक्षणासाठी वाहून घेतलेला एक निर्भय आवाज, सत्यरक्षक आणि शक्तीचे चालते-बोलते रूप अशी त्यांची ओळख करून देता येईल. सुश्री (कु.) डॉ. वैदेही ताम्हण यांच्या कार्याविषयी त्यांचे सहकारी श्री. अक्षय रेडीज् यांनी सांगितलेली माहिती येथे देत आहोत.

विशेष सदर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. कपोलकल्पित कथा आणि खोट्या कथानकांना विरोध करणार्या सुश्री डॉ. वैदेही ताम्हण !
सुश्री डॉ. वैदेही ताम्हण यांचे जीवन हा मूर्तीमंत धैर्याचा प्रवास आहे. पक्षपाती (पूर्वग्रहदूषित) वृत्ते आणि शासनाने पुरस्कृत केलेल्या कपोलकल्पित कथा यांच्यासमोर त्या कधीही झुकल्या नाहीत. जेव्हा देशातील प्रमुख प्रसारमाध्यमे हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर चिखलफेक करत होती, तसेच धर्मरक्षणासाठी कार्य करणार्या कार्यकर्त्यांना ‘कट्टर’ आणि सहजपणे ‘हिंदु आतंकवादा’च्या खोट्या कथानकाला पुष्टी देत होती, तेव्हा याचा विरोध करायला सुश्री डॉ. वैदेही ताम्हण खंबीरपणे उभ्या राहिल्या. मनात अन्यायाची चीड घेऊन त्यांनी हातात लेखणी घेतली. स्वत:च्या लिखाणातून त्यांनी व्यवस्थेला प्रश्न विचारले, षड्यंत्रे उघडकीस आणली आणि ‘लढाऊ वृत्ती असलेल्या पत्रकारांचे शब्द जेव्हा अंगारासारखे तेजस्वी बनतात, तेव्हा सत्याला दाबून टाकता येत नाही’, याची त्यांनी देशाला जाणीव करून दिली.
२. न्याय आणि धर्म यांच्यासाठी तत्त्वनिष्ठ अन् निर्भय पत्रकारिता करणार्या सुश्री डॉ. वैदेही ताम्हण !
सुश्री डॉ. वैदेही या केवळ वृत्तपत्रात संपादकीय लिहित नाहीत, तर त्यातून त्या समाजाला आव्हान करतात. त्यांनी आपल्या लिखाणातून गोरक्षण कायद्याची आवश्यकता, हिंदु जनजागृती समितीच्या फेसबुकवर घातलेली बेकायदेशीर बंदी, तसेच ‘भगव्या आतंकवादा’चा फोलपणा यांसारखे अनेक ज्वलंत विषय हाताळले आहेत. ज्यांचा आवाज दडपून टाकला, अशा लाखो लोकांचा त्या आवाज बनल्या. वर्ष २००८ मध्ये संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारने मूळ सत्याकडे दुर्लक्ष करत निलाजरेपणाने ‘हिंदु आतंकवाद’ नावाची संकल्पना उदयाला आणली. त्या वेळी त्याचा विरोध करणार्यांमध्ये सुश्री वैदेही अग्रभागी होत्या.
त्यांची पत्रकारिता ही न्याय आणि धर्म यांच्यासाठी चाललेले एक युद्धच बनले. सुश्री वैदेही यांचे कार्य राजकीय पक्षांच्या खोटेपणाला विरोध करणे एवढेच नाही, तर त्याची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे. त्यांनी स्वतःची ‘आफ्टरनून’ आणि ‘द डेमोक्रसी’ नावाची वृत्तपत्रे चालू करून स्वतंत्र, निर्भय अन् खंबीर असे समांतर साम्राज्य उभे केले. अशा आधुनिक काळात जेव्हा प्रसारमाध्यमे राजकीय पक्षांशी असलेली जवळीक आणि ‘टी.आर्.पी.’ यांच्यासाठी स्वतःची तत्त्वे बाजूला ठेवतात, त्याच काळात सुश्री वैदेही यांनी २० वर्षे एकहाती अन् कुणाच्याही साहाय्याविना स्वखर्चाने स्वतःचे वृत्तपत्र चालवले. ‘लांगूलचालन’ ही एक सामान्य गोष्ट झालेल्या आजच्या या जगात तत्त्वनिष्ठ आणि निर्भय पत्रकारिता करणे, हे सुश्री वैदेही यांच्या दृढनिश्चयाचे एक उदाहरण आहे.
समाजासाठी अविरत आणि खंबीरपणे कार्य करणार्या सुश्री डॉ. वैदेही ताम्हण !
वर्ष २०२५ मधील महाकुंभमेळ्यात त्यांनी गुरुदीक्षा घेऊन संन्यास घेतला. ‘त्यांनी घेतलेला संन्यास हा जगापासून दूर जाण्यासाठी नव्हे, तर आध्यात्मिक दृष्टीने जगाची सेवा करता यावी’, यासाठी आहे. त्यांचा संन्यास जगापासून अलिप्तता नसून साधना करून समष्टी सेवा करण्यासाठी उचलेले एक पाऊल आहे. सुश्री डॉ. वैदेही ताम्हण या केवळ बोलत नाहीत, तर त्या बोलल्याप्रमाणे कृती करतात. त्या अन्यायाचा विरोध करून त्याला वाचा फोडतात. ज्या वेळी व्यवस्था साहाय्य करू शकत नाहीत, त्या वेळी तेथे त्या साहाय्याला धावतात. सुश्री वैदेही या धार्मिक शीतयुद्धातील एक तळपती ज्वाला आहेत. जगाच्या योग्य नेतृत्वाचा शोध सुश्री वैदेही ताम्हण यांच्या रूपाने पूर्ण होतो. देश स्वतःचा अंतरात्मा शोधत असतांना त्या सद्सद्विवेकाच्या रूपाने उभ्या आहेत. सुश्री डॉ. वैदेही ताम्हण केवळ एक सत्त्वशील महिला नसून त्या समाजासाठी अविरत आणि खंबीरपणे कार्य करणार्या अविस्मरणीय अशा प्रत्यक्ष शक्तीस्वरूपा आहेत.
३. आयुर्वेद, आध्यात्मिक उपासना आणि प्राचीन वैदिक ज्ञानाचे पुनरुज्जीवन
वृत्तपत्रात लिखाण करणे हेच त्यांचे एकमेव कौशल्य नाही, तर त्या दुःखी अंतःकरणांवर फुंकर घालतात आणि आत्मशक्ती जागृत करण्यासाठी साहाय्य करतात. वैदेही यांनी ‘वेद आरोग्यम् पंचकर्म केंद्रे’ स्थापन केली आहेत. त्यांच्या वतीने त्या केवळ आयुर्वेद उपचार नव्हे, तर संस्कारपूर्ण उपाय करतात. या उपायांमुळे व्यसनाधीन व्यक्ती व्यसनमुक्त होतात. एवढेच नव्हे, तर त्यांचे आध्यात्मिक पुनर्वसनही होते. कल्याण येथील निसर्गरम्य वातावरणातील त्यांच्या आश्रमात आदिवासी बालके ‘सौंदर्य लहरी (शंकराचार्यांनी रचलेले स्तोत्र)’ची उपासना करतात. यामुळे अनेक दिशाहीन जिवांना जीवनाचा उद्देश कळतो. या आश्रमात सुश्री वैदेही यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचीन वैदिक ज्ञानाचे पुनरुज्जीवन चालू आहे.
#PahalgamAttack वरील डॉ. वैदेही ताम्हण यांचे संपादकीय वाचा –
|
४. धर्मांतर रोखण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न
त्या केवळ धर्मांतर रोखण्याविषयी बोलत नाहीत, तर धर्मांतर होऊ नये, यासाठी त्यांनी कित्येक कुटुंबांचे पुनर्वसन केले आहे. या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचे प्रायोजकत्व घेणे आणि त्यांच्यासाठी उपजीविकेची साधने निर्माण करणे अशा प्रकारे साहाय्य करून त्यांनी खरे हिंदुत्व सर्वसमावेशक, सुधारणावादी आणि अत्यंत करुणामयी आहे, हे दाखवून दिले आहे.
भारतातील विविध क्षेत्रांतील व्यक्ती, महिला आणि संस्था यांचा पुरस्कार देऊन सन्मान !

गेली १८ वर्षे त्या ‘न्यूजमेकर्स अचिव्हर्स ॲवार्ड’ आणि ‘पिलर्स ऑफ हिंदुत्व’ या व्यासपिठांवरून त्या प्रसिद्धीपासून दूर असलेल्या भारतातील कित्येक सामाजिक कार्यकर्ते, संस्कृती रक्षक, महिला नेत्या, आध्यात्मिक गुरु यांचा सत्कार करत आहेत. ‘अशा लोकांचे कार्य हा देशाचा आत्मा आहे’, असे त्या मानतात. सुश्री वैदेही या माध्यमातून अशा सर्वांना प्रोत्साहन देतात आणि त्यांचा सन्मान करतात. या पुरस्कारांविषयी सुश्री डॉ. वैदेही ताम्हण म्हणतात, ‘‘हे पुरस्कार अशा लोकांसाठी आहेत, ज्यांनी आपल्या समाज आणि संस्कृती यांसाठी अतुलनीय योगदान दिले आहे. त्यांचा सन्मान करणे, हा यामागचा उद्देश आहे. हा सन्मान म्हणजे देवभूमी उत्तराखंडच्या वारशाचे आणि हिंदुत्वाचे रक्षण करणार्यांचे कौतुक करण्यासारखे आहे.’’
५. वैदिक ज्ञानाचा प्रसार करणारे ‘वेदशास्त्र रिसर्च फाऊंडेशन’
‘वेदशास्त्र रिसर्च फाऊंडेशन’ ही संस्था स्थापन करून त्या वैदिक ज्ञानाचा प्रसार करत आहेत. त्यामुळे नवीन पिढीच्या मनात अध्यात्माचे बीजरोपण होत आहे. यातून ‘सनातन धर्म ही एक जीवनशैली आहे’, हा विचार रुजवण्याचे कार्य त्या करत आहेत.

६. ग्रंथ लेखिका, सन्मान आणि पुरस्कार

सुश्री डॉ. वैदेही या विविध प्रकारच्या कार्यात सहभागी आहेत. त्या ‘२७ सोल्स : स्पाईन चिलींग स्केरी स्टोरीज’ या इंग्रजी भाषेतील पुस्तकासह अत्यंत लोकप्रिय अशा ८ ग्रंथांच्या लेखिका आहेत.

त्यांनी अनेक महत्त्वाच्या उपक्रमांसाठी एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यांना पुष्कळ सन्मान आणि पुरस्कार मिळाले आहेत. ज्यात ‘फोर्ब्स’मध्ये सहभाग, जागतिक मान्यता आणि ‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डस्’मध्ये उल्लेख, ‘भारत विभूती पुरस्कार’ यांसह अनेक पुरस्कारांचा समावेश आहे. असे असले, तरी ‘लाखो लोकांच्या मनात त्यांच्याविषयी असणारा आदर हा त्यांचा खरा सन्मान आहे’, असे त्या मानतात.
दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि ‘सनातन संस्था’ यांचा सन्मान
सुश्री वैदेही ताम्हण यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ या मराठी वृत्तपत्राला ‘उत्कृष्ठ मराठी दैनिक’ म्हणून ‘न्यूजमेकर्स अचिव्हर्स ॲवार्ड’ १ मे २०१२ या दिवशी प्रदान केला.