
लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे राहुल गांधी यांनी नेहमीप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीकेचे अस्त्र उगारले. ‘सावरकर हे ब्रिटिशांचे सेवक होते’, असे विधान त्यांनी अगदी बेधडकपणे केले. सावरकर यांच्या अवमानाप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध लखनौ न्यायालयाने जारी केलेल्या समन्सला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. पुन्हा अशी विधाने न करण्याचीही चेतावणी दिली. ‘स्वातंत्र्यसैनिकांविषयी खोटी विधाने करण्याचा अधिकार कुणालाही नाही. जर भविष्यात पुन्हा असे विधान केले, तर न्यायालय त्या विधानाची नोंद घेईल’, अशा शब्दांत सर्वाेच्च न्यायालयाने त्यांची कानउघाडणी केली आहे. असे विधान करण्याची राहुल गांधी यांची ही काही पहिलीच वेळ नाही. अडीच वर्षांपूर्वीही राहुल गांधी यांनी अकोला येथे एका कार्यक्रमात सावरकरांविषयी वरीलप्रमाणेच विधान केले होते. मुद्दामहून सावरकरांविषयी अशा प्रकारे व्यक्त होणार्या राहुल गांधींचा यातून सावरकरद्वेष पूर्णतः उघड होतो, हे नाकारता येणार नाही.
प्रत्येक वेळी हिंदुत्वाला ओरबाडण्याचा राहुल गांधी यांचा अश्लाघ्य प्रयत्न यातून अधोरेखित होत असतो. असे असूनही त्यांचा अधिवक्ता म्हणतो की, माझ्या अशिलाचा कुणालाही चिथावणी देण्याचा हेतू नव्हता. अर्थात्च उंदराला मांजर साक्ष ! अधिवक्ता यातून केवळ स्वतःचाच लाभ पहाणार. त्याच्याही पुढे त्या अधिवक्त्याने न्यायालयाला वचन दिले की, माझे अशील यापुढे अशी कोणतीही विधाने करणार नाहीत. त्या अधिवक्त्यावर कोण विश्वास ठेवणार ? हे वचनही हवेत विरून जाणार, यात शंका नाही ! हे सगळे कसे सोयीस्कररित्या चालू आहे ! पंतप्रधान झाल्यावरही अनेकदा नेहरू हे लॉर्ड माऊंटबॅटन यांच्या सांगण्यानुसार कारभार करत होते, हे सर्वश्रुत आहे. मग असे आहे, तर ब्रिटिशांचे खरे सेवक कोण ? याचे उत्तर राहुल गांधी यांनी द्यायला हवे. वारंवार द्वेषपूर्ण विधाने करणारे राहुल गांधी यांच्यावर कठोर कारवाई कधी होणार ? ती झाल्याविना अशा विधानांना आळा बसणार नाही. राहुल गांधी यांना जनतेनेही पुरते ओळखलेले आहे. त्यामुळे त्यांना ओळखण्यात ती आता फसणार नाही.
ऐतिहासिक अज्ञान !

‘स्वातंत्र्यसैनिकांचा इतिहास समजून घेतल्याविना अशी विधाने करता येत नाहीत’, असा दमही न्यायालयाने त्यांना दिला. इतिहास समजून घेण्याआधी तो ठाऊक तरी असावा लागतो. राहुल गांधी यांना इतिहास म्हणजे काय, हे शिकवण्याचीच वेळ आली आहे. न्यायालयालाच त्यांना इतिहासातील प्रसंगांची आठवण करून द्यावी लागते, हे काँग्रेससाठी हास्यास्पद नव्हे का ? राहुल गांधी यांना राजकारणातील इतिहासकालीन पात्रांविषयी, म्हणजे त्यांच्याच नातलगांविषयी अगदीच तोकडा परिचय आहे. त्यामुळे गांधी-नेहरूंचा ‘हिंदी राष्ट्रवाद’ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘हिंदुराष्ट्रवाद ’ या संकल्पना तर त्यांच्यासाठी कोसो दूरच म्हणाव्या लागतील.
आतापर्यंत राहुल गांधींच्या संदर्भात अनेक प्रसंग घडल्याने त्यांना विविध विशेषणे (टीकात्मक) लावण्यात येतात. ‘वाचाळवीर’, ‘अनुभवहीन नेता’, ‘विदेशी विचारसरणी असलेला’, ‘भान नसलेला’ अशी अनेक विशेषणे टीका स्वरूपात लोकसभा विरोधी पक्षनेते तथा राहुल गांधी यांना वापरली जातात. घडतेही तसेच, त्यामुळे अशी टीका सर्रास त्यांच्यावर केली जाते. त्यामुळे अशा प्रसंगांची पुनरावृत्ती न झाल्यासच नवल ! देश स्तरावर अनेकांकडून त्यांची खिल्ली उडवली जाते, टीका केली जाते, खटले प्रविष्ट होतात; पण ती म्हण आहे ना, कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच !
राहुल गांधी यांना स्वातंत्र्यसैनिकांचा तर इतिहास ठाऊक नाहीच; पण त्यांचे आजोबा, पणजोबा यांच्याही इतिहासाविषयी ‘ओ का ठो माहीत नाही’ ! त्यांनी एका मुलाखतीत गांधी आणि नेहरू यांच्या कालखंडातील एक प्रसंग सांगितला. प्रत्यक्षात तसा प्रसंग घडलेलाच नाही; कारण त्यात राहुल यांनी दिलेले दाखले आणि वास्तव यांत पुष्कळ भिन्नता आहे. राहुल यांच्या म्हणण्याप्रमाणे नेहरूंनी संबंधित प्रसंगात ब्रिटिशांना दणका दिला; पण तेव्हा नेहरू अवघ्या ३ वर्षांचे होते. कुठल्या आधारावर राहुल गांधी अशी मते मांडतात ? ‘राहुल गांधी यांनी स्वतःचेच घोर अज्ञान प्रकट केले’, ‘ते स्वतःचेच हसे करून घेतात’, ‘असे नेते काँग्रेसला कुठे नेणार ?’ अशा स्वरूपाची टीका नेटकर्यांनी (इंटरनेट वापरकर्त्यांनी) त्यांच्यावर केली आहे आणि करत आहेत. राहुल गांधी तर स्वतःचे हसे करून घेतातच; पण त्यांना कार्यक्रमाला बोलावून स्वतःच्या कार्यक्रमाचे अवमूल्यन पदरी पाडून घेणार्यांनी तरी आता शहाणे व्हावे ! आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल केली जात असेल, अशा मान्यवरांना (?) कार्यक्रमासाठी बोलावतांना अवश्य विचार करावा !
भारताचे अवमूल्यन !
स्वातंत्र्याच्या काळात मुसलमानांनी ‘वन्दे मातरम् म्हणणार नाही आणि आम्हाला गोहत्या करू द्यावी’, या मागण्या केल्या. दुर्दैवाने हिंदूंना त्या वेळी काहीच बोलू दिले गेले नाही. त्याचाच अपलाभ घेत मुसलमानांनी या सर्व मागण्यांसह पाकिस्तान मिळवला आणि ते शिरजोर ठरले. हा मुसलमानांच्या सेवकांचा दुटप्पी इतिहास राहुल यांना कधी आठवणारही नाही आणि जरी ठाऊक असला, तरी ते त्याची कधी वाच्यताही करणार नाहीत; पण एक लक्षात घ्यावे की, जनता दूधखुळी नाही. ती सर्वकाही जाणते. स्वातंत्र्याच्या काळात सावरकरांनी जे भोगले, सोसले, ते पहाता राहुल गांधी त्यांच्या पासंगालाही पोचत नाही. त्यामुळे आता सावरकरद्वेष पुरे !
राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाविषयी प्रविष्ट केलेल्या खटल्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपिठासमोर झालेल्या सुनावणीत केंद्र सरकारला १० दिवसांत राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा अहवाल देण्यात सांगण्यात आले आहे. ज्यांच्या नागरिकत्वाविषयीच प्रश्नचिन्ह आहे, अशांना भारताच्या नागरिकांविषयी बेताल विधाने करण्याचा अधिकारच काय ? अमेरिकेतील ‘ब्राऊन युनिव्हर्सिटी’मध्ये विद्यार्थ्यांशी बोलतांना भारतातील निवडणूक प्रक्रिया, तसेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका यांविषयीही राहुल गांधी यांनी टीका केली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सर्वाेच्च प्रतिमा निर्माण करण्यासाठी अखंड झटत आहेत; पण त्याची किंमत न ठेवता बिनबुडाचे आरोप करत भारताचे मूल्य एका झटक्यात शून्यावर आणण्याचे महापापच राहुल गांधी यांनी केले आहे. याची किंमत त्यांना एक ना एक दिवस नक्कीच चुकवावी लागणार आहे. विदेशात जाऊन भारताची अपकीर्ती करणार्यांच्या नागरिकत्वाविषयी खरोखरच शंका घ्यायला हवी.
हिंदुद्वेष, मोदीद्वेष आणि सावरकरद्वेष या द्वेषाच्या गराड्यातून राहुल गांधी कधीच बाहेर पडणार नाहीत. ‘सामाजिक दायित्वाचे भान’ जोपासत ‘नैतिकता’ आणि ‘नेतृत्व’ हे पैलूही स्वतः अंगीकारावे लागतात, हे केवळ आणि केवळ एखाद्या कणखर नेत्यालाच जमू शकते. राहुल गांधी यांच्यासारख्यांसाठी ते अशक्यप्राय आहे. त्यांनी प्रथम या शब्दांचा अर्थ जाणण्याचे कष्ट घ्यावेत आणि प्रतिदिन स्वतःची डागाळत चाललेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करावा.
कुठे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा निर्माण करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर कुठे भारताचे मूल्य एका झटक्यात शून्यावर आणणारे राहुल गांधी ! |