|

बुलढाणा – देशाची आर्थिक स्थिती बिकट राहील. युद्धजन्य स्थितीमुळे राजावर (पंतप्रधानांवर) प्रचंड ताण-तणाव राहील. देशात परकियांचा त्रास वाढेल. प्रलयाची भीती, मंदीचे सावट राहील. शेजारी राष्ट्रासह युद्ध होण्याची शक्यता अल्प आहे; पण युद्ध झालेच, तर तिसर्या महायुद्धासारखे होईल, असे भाकीत येथील भेंडवळ येथील घट मांडणीच्या बहुप्रतीक्षित भाकितात १ मे या दिवशी करण्यात आले. चंद्रभान महाराज यांचे वंशज असलेले सारंगधार महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी हे भाकीत उघड केले. या वेळी बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव, कान्हादेश आणि सीमावर्ती मध्यप्रदेशमधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Bhendwal’s Ghat-Mandani Prophecy – 2025
Rituals have spoken. Dark omens rise:The King (PM) will face severe stress under war-like pressure
War with Pakistan likely to remain verbal, but if triggered — a World War-like storm#Prophecy2025 pic.twitter.com/jjeW3TvKtX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 2, 2025
भाकितात सांगण्यात आले की,
१. पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात आणि नंतरच्या तीन महिन्यांत पाऊस चांगला राहील. भरपूर अवकाळी पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी पहिल्या महिन्यात पेरण्यांची घाई करू नये.
२. यंदा पिकांचे प्रमाण सर्वसाधारण आहे. पिकांच्या नासाडीचे प्रमाण अधिक आहे.
३. देशात रोगराईचे प्रमाण अधिक असेल.
४. अवकाळीने गहू, ज्वारी, तांदूळ आणि इतर पिकांना फटका बसेल.
५. देशाचा राजा कायम असणार आहे.
६. पाकिस्तानसोबत चालू असलेले शाब्दिक युद्ध खरोखरच्या युद्धामध्ये पालटण्याची शक्यता न्यून आहे; मात्र युद्ध झाल्यास महायुद्ध होईल.