Bangladesh Threat to India : (म्हणे) ‘भारताने पाकवर आक्रमण केले, तर बांगलादेशाने ईशान्य भारताची ७ राज्य कह्यात घ्यावीत !’

बांगलादेशाचे निवृत्त मेजर जनरल ए.एल्.एम्. फजलुर रहमान यांचे फुत्कार

बांगलादेशाचे निवृत्त मेजर जनरल ए.एल्.एम्. फजलुर रहमान व बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस

ढाका (बांगलादेश) – जर शेजारी देशाने पाकिस्तानवर आक्रमण केले, तर बांगलादेशाने भारताच्या ईशान्येकडील ७ राज्यांवर नियंत्रण मिळवावे, असे फुत्कार बांगलादेशाचे निवृत्त मेजर जनरल ए.एल्.एम्. फजलुर रहमान यांनी येथे काढले. रहमान यांनी फेसबुकवर बंगाली भाषेत लिहिले की, या संदर्भात मला वाटते की, चीनसमवेत संयुक्त सैनिकी व्यवस्थेवर चर्चा चालू करणे आवश्यक आहे.

रहमान यांची फेसबुक पोस्ट

संपादकीय भूमिका

या विधानानंतर भारताने पाकिस्तासह बांगलादेशालाही कायमचा धडा शिकवून त्याला त्याची लायकी दाखवून दिली पाहिजे !