साधकांना सूचना
सध्याच्या काळात ‘भक्तांचे रक्षण करणे आणि धर्मसंस्थापना करणे’, हे कार्य जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचे आहे. त्यामुळे देश-विदेशांतील साधक, संत आणि सद्गुरु यांनी ‘स्वतःचे रक्षण व्हावे आणि ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील अडथळे दूर व्हावेत’, यांसाठी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप ३ दिवस प्रतिदिन १ घंटा करावा. हा आध्यत्मिक स्तरावरील उपाय शक्य तितक्या लवकर पूर्ण करावा.’ हा नामजप त्रास असलेले आणि नसलेले अशा सर्व साधकांनी करायचा आहे. या जपासाठी न्यास आणि मुद्रा नाही. हा जप शक्यतो सलग तीन दिवस करावा. काही कारणास्तव एखाद्या दिवशी करता आला नाही, तर दुसर्या दिवशी करावा. आपल्या उपलब्ध वेळेनुसार दिवसभरात १ घंटा नामजप पूर्ण करावा. हा नामजप नियमितच्या उपायांच्या व्यतिरिक्त करायचा आहे. (२५.४.२०२५)