Caste Census : केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार

नवी देहली – केंद्रीय मंत्रीमंडळाच्या ३० एप्रिल या दिवशी झालेल्या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले. यात येत्या जनगणनेमध्ये जातीनुसार गणना करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिदेत दिली.

या बैठकीत केंद्र सरकारने आसाम आणि मेघालय यांमधील महामार्ग बांधण्यालाही संमती दिली. शिलाँग ते सिलचर (मेघालय-आसाम) हाय-स्पीड कॉरिडॉर (महामार्ग) बांधला जाईल. तो १६६ कि.मी. लांब आणि ६ मार्गी असणार आहे. यासाठी २२ सहस्र ८६४ कोटी रुपये खर्च येईल.