जागतिक वारसा नामांकनासाठी असलेल्या राज्य संरक्षित गडांवर सुरक्षारक्षकांची नियुक्ती होणार !

मुंबई, ३० एप्रिल (वार्ता.) – केंद्रशासनाकडून महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडूमधील १ अशा १२ गड अन् दुर्ग यांची नावे जागतिक वारसा नामांकनासाठी ‘युनेस्को’कडे पाठवण्यात आली आहेत. यांतील राज्य संरक्षित स्मारक असलेल्या महाराष्ट्रातील राजगड (पुणे), प्रतापगड (सातारा), खांदेरी (रायगड) आणि साल्हेर (नाशिक) या गडांवर सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. याविषयी पुरातत्व विभागाच्या संचालकांनी विभागीय कार्यालयांकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचना दिली आहे. जागतिक नामांकनासाठी नावे पाठवण्यात आलेले अन्य ८ पैकी ७ किल्ले भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यरीत, तर जिंजी दुर्ग तामिळनाडूमध्ये आहे.