‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या वतीने उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे धर्मसंसदेचे आयोजन
हृषिकेश (उत्तराखंड) – प्रयागराज महाकुंभपर्वात अहिंदूंच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर चारधाम यात्रेतही अहिंदूंच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी जुना आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी प्रबोधानंद गिरि यांनी उत्तराखंड सरकारकडे केली. ते उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील स्वामीनारायण घाटावर ‘आज तक’ वृत्तवाहिनीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेतील ‘देवभूमीचा गौरव’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते. या चर्चासत्रात हृषिकेशच्या जगन्नाथ धामचे महंत लोकेश दास आणि साध्वी जया भारती सहभागी झाल्या होत्या.

स्वामी प्रबोधानंद गिरि पुढे म्हणाले की,
१. चारधाम यात्रा ही आत्मशांतीसाठी आहे. ही तीर्थस्थळे भाविकांना शांततेची अनुभूती देतात. हे वातावरण कायम टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. उत्तराखंड ही देवभूमी आहे; पर्यटनस्थळ नाही. येथे तीर्थयात्रा करण्यासाठी यावे, पर्यटनाच्या उद्देशाने येथे येऊन देवभूमीचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न कुणी करू नये.
२. पहलगाममधील आक्रमण हा संपूर्ण जगाला संदेश आहे की, आतंकवादी लोक पृथ्वीवर शांतता प्रस्थापित होऊ देणार नाहीत. तथापि हिंदूंना संपवणारे संपतील; पण सनातन नेहमीच राहील, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
पहलगाममधील आतंकवादी आक्रमण हे धर्मावर आक्रमण आहे ! – महंत लोकेश दास

महंत लोकेश दास म्हणाले की, पहलगाम आतंकवादी आक्रमण हे धर्मावर आक्रमण आहे. आपण संघटित झालो पाहिजे.
सरकारने हिंदूंना सुरक्षिततेची हमी द्यावी ! – साध्वी जया भारती
साध्वी जया भारती म्हणाल्या की, हिंदूंनी सनातनी असायला हवे. चेतना जाणून घेणे आणि त्या प्रक्रियेत गुंतलेले रहाणे, हाच शाश्वत धर्म आहे. ती भारताची ओळख आहे. हिंदूंनी कायम एकजूट असले पाहिजे. हिंदूंना सुरक्षा हवी असल्याने त्यांनी हे सरकार निवडले आहे. त्यामुळे सरकारने आता असे काहीतरी करावे, ज्याने हिंदूंना सुरक्षिततेची हमी मिळेल.
संपादकीय भूमिकाधर्मांध मुसलमानांच्या हिंदुद्वेषी कृत्यांमुळेच हिंदू, त्यांचे संत, नेते आदींवर अशी मागणी करण्याची वेळ आली आहे. हे ठाऊक असूनही पुरोगाम्यांनी धर्मांधांच्या हिंदुद्वेषाकडे दुर्लक्ष करून अशी मागणी कणार्या हिंदूंनाच लक्ष्य केल्यास आश्चर्य वाटू नये ! |