बिहारमधील छपरा येथे साहिवान अन्सारी याने दिली हिंदूंना धमकी
छपरा (बिहार) – येथील फळविक्रेता साहिवान अन्सारी याने फळे खरेदी करण्यासाठी आलेल्या अमरिंदर सिंह यांना पैशाच्या व्यवहारावरून धमकी दिली की, काश्मीरमध्ये २७ हिंदू मारले गेले आहेत, येथे २ सहस्र ७०० हिंदू मारले जातील.
🚨 SHOCKING threat from Chhapra, Bihar! 😡
“If 27 were killed in Kashmir, 2700 will be slain here” – open threat by Sahiban Ansari! ⚠️🩸
This audacity is the result of decades of shameless appeasement politics. 🤬🧾
Such fanatics must face strict and immediate action! ⚖️🔥… pic.twitter.com/W8qWqtUTN0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 30, 2025
१. हे प्रकरण केळी खरेदी करण्यापासून चालू झाले. ग्राहक अमरिंदर सिंह केळी खरेदी करण्यासाठी दुकानात गेले. तेथे साहिवान अन्सारी याने सुटे पैसे न आणल्याविषयी त्यांना शिवीगाळ केली. वाद वाढत गेल्याने अन्सारीने त्याच्या मित्रांना बोलावून अमरिंदर सिंह यांना मारहाण केली. मग त्याने हिंदूंना ठार मारण्याची धमकी दिली. अमरिंदर सिंह यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे.
२. या प्रकरणात फळविक्रेता साहिवान अन्सारी आणि त्याचे शेजारी साथीदार मिंटू अन्सारी, साबीर अन्सारी, सेराज अन्सारी, खुर्शीद अन्सारी, शमशाद अन्सारी, जावेद हास्मी आणि इतर २० जण यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
३. या आरोपींवर लाठ्या-काठ्यांनी क्रूरपणे मारहाण केल्याचा आरोप आहे. पीडित अमरिंदर प्रसाद यांनी मिंटू अन्सारी याने त्यांच्या खिशातून ९ सहस्र ५०० रुपये काढल्याचा आणि सेराज अन्सारी याने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावल्याचा आरोपही केला आहे.
संपादकीय भूमिकाभारत स्वतंत्र झाल्यापासून निधर्मी राज्यकर्त्यांनी त्यांचे मोठ्या प्रमाणात लांगूलचालन केल्यामुळे ते उद्दाम झाले आहेत. त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी कठोर शिक्षा करणे आवश्यक ! |