
मुंबई – राज्यात वर्ष २०२८ पर्यंत बुलेट ट्रेन धावणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील ‘भारत-मध्य पूर्व-युरोप इकॉनॉमी कॉरिडॉर समिट २०२५’ मध्ये ते बोलत होते.
५०८ किमी लांबीचा असलेला मुंबई-अहमदाबाद हा प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात या राज्यांसह दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून जाणार आहे. ‘नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ या प्रकल्पाची कार्यवाही करत आहे. शिंकानेस हे जपानी तंत्रज्ञान बुलेट ट्रेन निर्मितीसाठी वापरले जात आहे. बुलेट ट्रेन ३२० किमान, तर ३५० कमाल वेगाने धावणार आहे. ५०८ किमी पैकी १५४.७६ कि.मी. मार्ग महाराष्ट्रातून जातो. वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, विरार आणि बोईसर ही बुलेट ट्रेनची महाराष्ट्रातील स्थानके आहेत.