कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी अहंनिर्मूलनासाठी भक्तीयोग अधिक साहाय्यक !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘साधना करतांना अहंनिर्मूलन होणे आवश्यक असते; पण ज्ञानयोग, कर्मयोग आणि हठयोग या मार्गांनी साधना करतांना अहंनिर्मूलन करणे, फार थोड्या जणांना जमते. त्या तुलनेत भक्तीयोगानुसार साधना करतांना अहंनिर्मूलन लवकर आणि सहजतेने होते. आजवर अनेक ज्ञानयोगी संत होऊन गेले; परंतु त्यांनीही कोणत्या तरी देवतेची अथवा त्यांच्या गुरूंची भक्ती केली. त्यामुळे अन्य साधनामार्गांनी साधना करणार्‍यांनी समवेत भक्तीयोगानुसारही काही प्रमाणात साधना केली, तर त्यांना त्यांचे ध्येय लवकर साध्य होऊ शकते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले