मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा !

मुंबई – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणात मृतांच्या कुटुंबातील वारसांना ५० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत केली. मंत्रीमंडळाच्या बैठकीपूर्वी मृतांना श्रद्धांजली वहाण्यात आली.
या आक्रमणातील मृतांच्या कुटुंबांतील मुलांचे शिक्षण, रोजगार यांकडे राज्य सरकार लक्ष देईल. यातील ज्या कुटुंबांत रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णयही देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे घोषित केले.