‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील संभाव्य अडथळे, त्यामागील कारणे आणि ती दूर होण्यासाठी करायचे आध्यात्मिक उपाय !

‘२२.४.२०२५ या दिवशी पहलगाम (जम्मू आणि काश्मीर) येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणामध्ये २८ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तान या २ देशांत प्रचंड तणाव वाढून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘यामागील सूक्ष्मातील कारणे कोणती ? या घटनेमुळे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त होणार्‍या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त कोणते अडथळे येऊ शकतात ? आणि त्यावरील आध्यात्मिक उपाय’, यांसंदर्भात देवाच्या कृपेमुळे मला सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे. 

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे बोधचिन्ह

१. वर्ष २०२५ पासून धर्म-अधर्म यांतील स्थुलातील युद्धाला प्रारंभ झालेला असणे 

कलियुगात वाईट शक्तींमुळे सनातन धर्माचा र्‍हास वेगाने होत आहे. कालमाहात्म्य, ईश्वरी नियोजन आणि संतांनी केलेले कार्य यांमुळे सनातन धर्माच्या स्थितीमध्ये पुढे चांगले पालट होणार आहेत. ‘असे होऊ नये’, यासाठी वर्ष २०२५ पासून वाईट शक्ती स्थुलातून कार्य करू लागल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून भारत आणि पाकिस्तान या देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

श्री. राम होनप

२. वाईट शक्तींचे आगामी दुहेरी नियोजन ! 

भारत हा सनातन धर्माचा आधारस्तंभ आहे. सप्तपाताळांत सनातन धर्माला विरोध करणार्‍या असंख्य वाईट शक्ती आहेत. त्यांपैकी ७५ टक्के वाईट शक्तींनी ‘भारत-पाकिस्तान युद्ध पेटावे आणि त्यात भारत नामशेष व्हावा’, यासाठी प्रयत्न करायचा’ अन् २५ टक्के वाईट शक्तींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ बंद पाडायचा’, असे दुहेरी नियोजन केले आहे.

३. वाईट शक्ती ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला विरोध करत असल्याचे कारण 

सनातन धर्माला पुढे चांगला काळ प्राप्त होणार आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. त्यांपैकी एक कारण, म्हणजे ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे अवतारी कार्य’, हे आहे. परात्पर गुरु डॉक्टरांच्या अस्तित्वामुळे पाताळांतील वाईट शक्तींचा जोर न्यून होऊ लागला असल्याने वाईट शक्ती चिडल्या आहेत आणि त्यामुळे त्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला सूक्ष्मातून तीव्र विरोध करत आहेत.

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.४.२०२५)

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’मधील अडथळे दूर होण्यासाठी करायचा आध्यात्मिक स्तरावरील उपाय

सध्याच्या काळात ‘भक्तांचे रक्षण करणे आणि धर्मसंस्थापना करणे’, हे कार्य जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचे आहे. त्यामुळे देश-विदेशांतील साधक, संत आणि सद्गुरु यांनी ‘स्वतःचे रक्षण व्हावे आणि ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तील अडथळे दूर व्हावेत’, यांसाठी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप ३ दिवस प्रतिदिन १ घंटा करावा. हा आध्यत्मिक स्तरावरील उपाय शक्य तितक्या लवकर पूर्ण करावा.’

– श्री. राम होनप (२५.४.२०२५)