
पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताने पाकला धडा शिकवण्याचे ठरवले असले, तरी भारतातील पाकप्रेमी मुसलमानांनाही धडा शिकवण्याची वेळ आली आहे. आता दोन्ही स्तरांवर आरपारची लढाई करावीच लागणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काही दशकांपूर्वीच सांगितले होते, ‘भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले, तर अंतर्गत पाकप्रेमी उठाव करतील, तेव्हा त्यांना कोण रोखणार ? अशा स्थितीत लढण्यासाठी हिंदूंनी सिद्ध रहायला हवे.’ त्यांचे विधान आता खरे ठरत असून याचा प्रत्यय शिवसेनाप्रमुखांची कर्मभूमी असणार्या मुंबईतच आला आहे. सांताक्रूझ येथे राष्ट्रप्रेमी नागरिकांकडून पाकिस्तानचा राष्ट्रध्वज रस्त्यावर चिकटवण्यात आला होता. यातून त्याचा अवमान करून पाकचा निषेध करण्यात येत होता. हे पाहून संतप्त झालेल्या काही पाकप्रेमी मुसलमानांनी या राष्ट्रप्रेमींवर चाकूने वार केले. यात घायाळ झालेल्यांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत. मुंबईच्या शेजारील नालासोपारा येथे २ ठिकाणी मुसलमानांनी पाकच्या राष्ट्रध्वजाच्या अवमानाचा विरोध केला. यात मुसलमान महिला पुढे होत्या. विरोधाचे कारण काय, तर तो राष्ट्रध्वज इस्लामचा असल्याचे त्यांचे म्हणणे होते. प्रत्यक्षात इस्लामचा ध्वज आणि पाकचा राष्ट्रध्वज यांच्यात भेद आहे; मात्र जाणीवपूर्वक भारतियांना विरोध करून पाकप्रेम दाखवण्यात येत आहे. अशा घटना अन्यत्रही घडल्या आहेत आणि घडू शकणार आहेत. ही एक झलक आहे. यापूर्वीही अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून, म्हणजे वर्ष १९२१ मध्ये मोपला हत्याकांड, वर्ष १९४६ चा ‘डायरेक्ट ॲक्शन डे’च्या अंतर्गत हिंदूंच्या केलेल्या हत्या, तसेच वर्ष १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी झालेली दंगल अन् पुढे कित्येक अशा दंगली झाल्या आहेत, ज्यामध्ये हिंदूंना कायमच मार खावा लागला आहे. या सगळ्या दंगलीतून हिंदू कधी शिकले नाहीत, हेच वारंवार दिसून आले आहे.
यापुढे पाकप्रेमी मुसलमानांकडून भारतियांवर मोठ्या संख्येने आक्रमण होऊन दंगली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे आता सीमेवर भारतीय सैन्य आणि देशात राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी स्वतःसह देशवासियांच्या रक्षणार्थ सदैव सिद्ध रहायला हवे. आतंकवाद्यांच्या आक्रमणापूर्वी बंगालच्या मुर्शिदाबाद येथे धर्मांध मुसलमानांनी एक झलक दाखवून दिलेली आहे. ही स्थिती मुसलमानबहुल भागांत येऊ शकत असल्याने तेथील हिंदूंचे रक्षण करण्यासाठी अन्यत्रच्या हिंदूंनी पोलिसांसह नियोजन करणे आवश्यक आहे. ज्या राज्यांत भाजपची सरकारे आहेत, तेथे सरकारनेच या दृष्टीने कृतीशील झाले पाहिजे. अशा ठिकाणी पाकप्रेमी मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमणे होणार नाहीत, याचा बंदोबस्त आधीच करायला हवा, असे हिंदूंना वाटते. हिंदूंनी ‘एक हैं तो सेफ हैं ।’ या दृष्टीनेच भाजप सरकारला सत्तेवर बसवले असल्याने सरकारने आता दायित्व पार पाडण्याची वेळ आली आहे. त्यासाठी सरकारने हिंदूंच्या संघटनांचे साहाय्य घेतले पाहिजे. सर्वत्र पोलीस पुरे पडणार नाहीत, याची जाणीव ठेवावी लागेल. दुसरीकडे काही ठिकाणी हिंदूंकडून पाकप्रेमी मुसलमानांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसायमंत्री नितेश राणे यांनीही अशाच प्रकारचे आवाहन केले आहे. त्यांनी ‘जे विक्रेते हनुमानचालिसा म्हणणार नाहीत, त्यांच्याकडून साहित्य घेऊ नये’, असे म्हटले आहे. कालपर्यंत केवळ राष्ट्रप्रेमी हिंदु संघटना जे म्हणत होत्या, ते आता सामान्य जनता आणि मंत्रीही बोलू लागले आहेत. याचाच अर्थ आता जनतेला ‘सर्वधर्मसमभाव’ असा काही प्रकार या देशात नाही, हे उमगले आहे. हा सुदिनच म्हणावा लागणार आहे. आज संपूर्ण देशातील राष्ट्रप्रेमींना कळून चुकले आहे की, जिहादी आतंकवादाला धर्म असतो आणि तो हिंदूंनाच लक्ष्य करतो. काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी यापासून देशाला भरकटवण्याचा प्रयत्न केला; मात्र याच जिहादी आतंकवाद्यांनी स्वतःच या पक्षांना खोटे पाडले आहे. त्यामुळे आता प्रत्येक दिवस वैर्याचाच असणार आहे, हे लक्षात ठेवून प्रत्येक हिंदूने स्वसंरक्षणार्थ आणि राष्ट्ररक्षणार्थ सिद्ध रहाणे अनिवार्य आहे. ही स्थिती आज ना उद्या येणारच होती, ती आता आली असल्याने राष्ट्रप्रेमींनी सिद्ध रहावे !