छत्तीसगडमधील काँग्रेसचे माजी आमदार यू.डी. मिंज यांचे देशद्रोही विधान

नवी देहली – छत्तीसगडमधील काँग्रेसचे माजी आमदार यू.डी. मिंज यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये ‘पाकिस्तानशी युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित आहे’ असे विधान केले आहेत. सत्ताधारी भाजपने काँग्रेसच्या या नेत्याच्या विधानावर आक्षेप घेतल्यानंतर ‘माझे खाते हॅक (नियंत्रण मिळवणे) करण्यात आले’, असा दावा मिंज त्यांनी केला. २६ एप्रिलला त्यांनी केलेली ही पोस्ट आता काढून टाकण्यात आली आहे.
“If a war breaks out with Pakistan, India’s defeat is certain!” 😡
This anti-national filth was spewed by ex-Congress MLA UD Minj from Chhattisgarh.
How DARE anyone say such a thing?
A sedition case must be filed NOW, and capital punishment pursued! ⚖️🛑
After the… pic.twitter.com/VcePrZQM6T
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 29, 2025
मिंज यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘जे आज पाकिस्तानविरोधात निर्णायक युद्धाविषयी बोलत आहेत, त्यांना हेदेखील ठाऊक असावे की, पाकिस्तानसह भारताला चीनशीही लढावे लागेल आणि अशा स्थितीत भारताचा पराभव निश्चित आहे. पाकव्याप्त काश्मीर महत्त्वाचा भाग असून तिथे चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. हीच अवस्था बलूचिस्तानची आहे. ग्वादर बंदर चीनने विकसित केले आहे. त्याच्या सुरक्षेसाठी चीनचे सैन्य तिथे तैनात आहे. बलुचिस्तानच्या बंडखोरांची चिनी सैनिकांशी लढण्याची शक्ती नाही. या दोन्ही ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी सक्रीयआहेत. एटाबाबाद हे असे ठिकाण आहे, जिथे लष्कर-ए-तोयबाचे जाळे आहे. जर भारताने या दोन्ही ठिकाणांवर थेट आक्रमण केले, तर चीन स्वत: या युद्धात पाकिस्तानसमवेत उभा राहील, त्याचा विचार करा.’
संपादकीय भूमिका
|