Congress Ex-MLA UD Minz : (म्हणे) ‘पाकिस्तानशी युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित !’

छत्तीसगडमधील काँग्रेसचे माजी आमदार यू.डी. मिंज यांचे देशद्रोही विधान

काँग्रेसचे माजी आमदार यू.डी. मिंज आणि त्यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट !

नवी देहली – छत्तीसगडमधील काँग्रेसचे माजी आमदार यू.डी. मिंज यांनी फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये ‘पाकिस्तानशी युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित आहे’ असे विधान केले आहेत. सत्ताधारी भाजपने काँग्रेसच्या या नेत्याच्या विधानावर आक्षेप घेतल्यानंतर ‘माझे खाते हॅक (नियंत्रण मिळवणे) करण्यात आले’, असा दावा मिंज त्यांनी केला. २६ एप्रिलला त्यांनी केलेली ही पोस्ट आता काढून टाकण्यात आली आहे.

मिंज यांच्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘जे आज पाकिस्तानविरोधात निर्णायक युद्धाविषयी बोलत आहेत, त्यांना हेदेखील ठाऊक असावे की, पाकिस्तानसह भारताला चीनशीही लढावे लागेल आणि अशा स्थितीत भारताचा पराभव निश्चित आहे. पाकव्याप्त काश्मीर महत्त्वाचा भाग असून तिथे चीनने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. हीच अवस्था बलूचिस्तानची आहे. ग्वादर बंदर चीनने विकसित केले आहे. त्याच्या सुरक्षेसाठी चीनचे सैन्य तिथे तैनात आहे. बलुचिस्तानच्या बंडखोरांची चिनी सैनिकांशी लढण्याची शक्ती नाही. या दोन्ही ठिकाणी पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी सक्रीयआहेत. एटाबाबाद हे असे ठिकाण आहे, जिथे लष्कर-ए-तोयबाचे जाळे आहे. जर भारताने या दोन्ही ठिकाणांवर थेट आक्रमण केले, तर चीन स्वत: या युद्धात पाकिस्तानसमवेत उभा राहील, त्याचा विचार करा.’

संपादकीय भूमिका

  • असे बोलण्याचे धाडस होतेच कसे ? अशांविरुद्ध तात्काळ देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
  • पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडून सातत्याने देशद्रोही आणि हिंदुद्रोही विधाने केली जात असल्याने या पक्षावर सरकारने बंदी घातली पाहिजे !