
पुणे – राज्यात दुष्काळी भागात सिंचनाचे क्षेत्र निर्माण करण्यासाठी शासन नदीजोड प्रकल्प राबवत असल्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. नदीजोड प्रकल्पाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विखे पाटील पुढे म्हणाले की, हा प्रकल्प निर्धारित आणि समयमर्यादेत पूर्ण होण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल. प्रकल्पासाठी वन्यभूमी, पर्यावरण, केंद्रीय जल आयोग, महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधिकरण आणि अन्य अनुमती तातडीने घेतल्या जातील. या वेळी कोकण ते गोदावरी, दमणगंगा-एकदरे- गोदावरी या नदीजोड प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.