
कोल्हापूर – काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब गटाच्या वतीने तावडे हॉटेल परिसरात २६ एप्रिलला पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला, तसेच आतंकवाद्यांचे छायाचित्र जाळण्यात आले. या प्रसंगी ‘जलादो जलादो, पाकिस्तान जलादो’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, विक्रम चौगुले, शशी बीडकर, राजेंद्र पाटील, राजू सांगावकर यांसह अन्य उपस्थित होते.