कोल्हापूर येथे उपजिल्हाधिर्यांकडे निवेदनाद्वारे मागणी !

कोल्हापूर – बंगाल येथील ममता बॅनर्जी यांचे सरकार तात्काळ विसर्जित करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करा, तसेच पहलगाममध्ये हिंदूंवर आक्रमण करणारे आतंकवादी आणि त्यांना सहकार्य करणार्यांवर कारवाई करा, या मागण्यांचे निवेदन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकार्यांना देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी ते स्वीकारले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव, शहर कार्यवाह श्री. आशीष लोखंडे, सर्वश्री नीलेश पाटील, आदित्य जमदाडे, आशीष पाटील, नितीन काळे, अर्जुन चौगुले, कैलास शिंदे, सुमेध पवार, शिवाजी मोटे यांसह अन्य धारकरी उपस्थित होते.