कठोर सैन्य कारवाई करून आतंकवाद्यांना जन्माची अद्दल घडवावी !

पुणे येथे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे मागणी !

डावीकडून सर्वश्री मनोहर उणेचा, राजेंद्र शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, सर्वश्री इंद्रसिंग राजपुरोहित, सुरेंद्र महाजन, राजन घोरपडे

पुणे, २८ एप्रिल (वार्ता.) – पहलगाम परिसरात आतंकवाद्यांनी पर्यटकांवर धर्म विचारून केलेले भ्याड आक्रमण भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदु समाजावर झालेले थेट आक्रमण दर्शवते. भारत सरकारने जिहादी अतिरेक्यांना आणि त्यांच्या भारतातील हस्तकांवर कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले. या वेळी श्री. मनोहर उणेचा, श्री राजेंद्र शर्मा, ‘भारतमाता मंदिर प्रोजेक्ट खिंवाडा पाली, राजस्थान’चे श्री. इंद्रसिंग राजपुरोहित, श्री. सुरेंद्र महाजन, श्री. राजन घोरपडे उपस्थित होते.