सातारा येथे आंदोलन !

सातारा, २८ एप्रिल (वार्ता.) – पहलगाम येथे हिंदु पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या. ही घटना आतंकवाद्यांची क्रूरताच नाही, तर भारताच्या सार्वभौमत्वावर आणि हिंदु समाजावर केलेले थेट आक्रमण आहे. या आतंकवादी कारवायांना भारत सरकारने जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी सातारा येथील बजरंग दल परळी विभागाचे प्रमुख सौरभ बोबडे यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ एप्रिल या दिवशी राजवाडा येथील गोलबाग परिसरामध्ये आंदोलन करण्यात आले, तेव्हा ते बोलत होते.
या वेळी हिंदु महासभेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अधिवक्ता दत्तात्रय सणस, बजरंग दलाचे माजी सातारा शहरमंत्री जितेंद्र वाडेकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे अधिवक्ता जनार्दन करपे, करंजे येथील श्री भैरवनाथ मंदिराचे विश्वस्त तुषार पाटील, महाबळेश्वर येथील श्री पंचगंगा मंदिराचे पुजारी पंढरीनाथ लांगी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ दिनेश पाठक, विश्वास सावरकर, हिंदु जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे, सौ. भक्ती डाफळे आदी मान्यवरांसह पुष्कळ धर्माभिमानी हिंदू या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.
अधिवक्ता दत्तात्रय सणस म्हणाले की, काश्मीर खोर्यामध्ये व्यापक ‘कोंबिंग ऑपरेशन’ (धरपकड मोहीम) राबवून आतंकवाद्यांचा बिमोड करण्यात यावा. काश्मीरमधील हिंदु पर्यटक, व्यावसायिक यांच्या जीवित रक्षणासाठी सुरक्षा आराखडा लागू करण्यात यावा.
बजरंग दलाचे जितेंद्र वाडेकर म्हणाले की, ज्या ठिकाणी आतंकवादी आक्रमणे होत आहेत, तेथे कायमस्वरूपी सैन्य तळ उभारण्यात यावे. त्यामुळे पाकपुरस्कृत आतंकवादी कारवायांना कायमचा चाप बसेल.