
मुंबई – केंद्रशासनाच्या निर्देशानुसार पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडावा, असे आहे; पण सिंधी समाजाचे लोक दीर्घकालीन ‘व्हिसा’वर भारतात आले आहेत. त्यामुळे त्यांना भारत सोडण्याचे कारण नाही. जे पाकिस्तानी नागरिक अल्प कालावधीच्या ‘व्हिसा’वर आले आहेत, त्यांना मात्र देश सोडावा लागेल. त्यांनी आता भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे.