
पणजी – मार्च २०२५ मध्ये गोव्यात एकूण १९८ रस्ते अपघात झाले असून त्यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला असून ८९ जण घायाळ झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. मृतांमध्ये १२ दुचाकीस्वार, ३ मागे बसलेले प्रवासी आणि ५ पादचारी यांचा समावेश होता.
उत्तर गोव्यात झालेल्या ९५ अपघातांत १२ मृत्यू, तर दक्षिण गोव्यातील १०३ अपघातांत ८ मृत्यू नोंदवले गेले. राज्यभरात २४ जण गंभीर घायाळ, तर ६५ जण किरकोळ घायाळ झाले आहेत.