‘आतंकवाद्यांनी धर्म विचारून गोळीबार केला नाही !’ – कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री आर्.बी. तिम्मापूर

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री आर्.बी. तिम्मापूर यांचे संतापजनक विधान

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री आर्.बी. तिम्मापूर

बेंगळुरू (कर्नाटक) – पहलगाम येथे आक्रमण करण्यात आले, तेव्हा आतंकवाद्यांनी तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले असेल, असे मला वाटत नाही. जरा व्यावहारिक पद्धतीने विचार करा. ज्याला गोळी झाडावी लागते, तो कुणाची जात किंवा धर्म विचारेल का ? तो केवळ गोळीबार करील आणि तिथून निघून जाईल, असा दावा कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री आर्.बी. तिम्मापूर यांनी पत्रकाराशी बोलतांना केले. भाजपने यावर टीका करतांना तिम्मापूर यांचे विधान क्रूर असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी काँग्रेसचे नेते एम्. लक्ष्मण यांनीही अशाच प्रकारचे विधान केले होते. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाकसमवेत युद्ध करू नये, असे आवाहन केले होते.

संपादकीय भूमिका

  • अशा प्रकारचे विधान केवळ गोळीबार करणारे आतंकवादीच करू शकतील ! काँग्रेस म्हणजे इस्लामी आतंकवादप्रेमी संघटना झाली आहे. तिच्यावरही आता बंदी घातली पाहिजे आणि यासाठी हिंदूंनी देशभरातून मागणी करत सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे !
  • तिम्मापूर यांचे विधान हे या आक्रमणात मृत्यूमुखी पडलेल्या हिंदूंच्या कुटुंबियांचा अवमान करणारे आहे. त्यांची भावना दुखावल्यावरून तिम्मापूर यांच्यावर गुन्हा नाेंदवून त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे !