कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री आर्.बी. तिम्मापूर यांचे संतापजनक विधान

बेंगळुरू (कर्नाटक) – पहलगाम येथे आक्रमण करण्यात आले, तेव्हा आतंकवाद्यांनी तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले असेल, असे मला वाटत नाही. जरा व्यावहारिक पद्धतीने विचार करा. ज्याला गोळी झाडावी लागते, तो कुणाची जात किंवा धर्म विचारेल का ? तो केवळ गोळीबार करील आणि तिथून निघून जाईल, असा दावा कर्नाटकमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री आर्.बी. तिम्मापूर यांनी पत्रकाराशी बोलतांना केले. भाजपने यावर टीका करतांना तिम्मापूर यांचे विधान क्रूर असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी काँग्रेसचे नेते एम्. लक्ष्मण यांनीही अशाच प्रकारचे विधान केले होते. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पाकसमवेत युद्ध करू नये, असे आवाहन केले होते.
💥 ‘Terrorists didn’t ask religion before firing,’ says Karnataka Congress Minister R.B. Thimmapur!
After Maharashtra MLA Vijay Wadettiwar, now another Congress leader insults the Pahalgam victims!
Only a terrorist sympathiser speaks like this.
Congress has turned into a hub… https://t.co/gD3NYrd6pr pic.twitter.com/9lCJex2oZy
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 28, 2025
संपादकीय भूमिका
|