अतिक्रमण विभागाच्या कारवाईला केराची टोपली !

नवी मुंबई – तुर्भे येथील ए.पी.एम्.सी. फळ मार्केट ते भाजी मार्केटपर्यंतच्या पदपथावर आंब्याच्या पॅकिंगसाठी लागणार्या लाकडी पेट्यांची विक्री करणार्यांनी बेकायदेशीर व्यवसाय चालू केला आहे. तुर्भे विभाग कार्यालयाच्या अतिक्रमण विभागाने २ आठवड्यांपूर्वी थातुरमातुर कारवाई केली होती; पण त्यानंतर पुन्हा या लाकडी पेट्यांची महापालिका पदपथावर विक्री केली जात आहे. अग्नीशमन विभागही याकडे दुर्लक्ष करत आहे. मागील वर्षी येथे लागलेल्या आगीमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट सचिवांनी ज्वलनशील वस्तू बाजारात ठेवण्यास प्रतिबंध केला होता.
भाजी मार्केट लगतच्या टाटा पॉवर आस्थापनाच्या उच्चस्तरीय विद्युत वाहिन्यांखालील मोकळा भूखंड माजी लोकप्रतिनिधींच्या २ कार्यकर्त्यांनी बळकावला आहे. त्यांनी विद्युत वाहिनीला हात टेकतील इतक्या उंचीवर लाकडी पेट्यांचे थरावर थर रचले आहेत.
संपादकीय भूमिकाअशा स्थितीत एखादी दुर्घटना घडल्यास त्याला उत्तरदायी कोण ? |