पाकिस्तान विभाजानच्या उंबरठ्यावर,बलुचिस्तानची निर्मिती होणार! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २८ एप्रिल (वार्ता.) – नेहमी स्वार्थ पहाणारा पाकिस्तान विभाजनाच्या उंभरठ्यावर उभा आहे. आता बलुचिस्तानची निर्मिती होणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करतांना केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले,

१. देश स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये हिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे, तर भारतात मुसलमानांची संख्या वाढली आहे. देशाचे विभाजन झाल्यानंतरही अनेक मुसलमान भारतातच राहिले आणि नंतर त्यांची लोकसंख्या वाढली.

२. आम्हाला याची चिंता नाही. भारत हा सर्वधर्मसमभाव मानणारा देश आहे. याठिकाणी सर्व धर्मीय लोक गुण्यागोविंदाने रहात असतात. वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानचे २ तुकडे झाले आणि बांगलादेशाची निर्मिती झाली. आता बलुचिस्तानचे नागरिक त्यांची भूमी बळजोरीने पाकिस्तानने घेतल्याचे सांगून पाकिस्तानच्या विरोधात बंड करत आहेत.

३. वर्ष १९९० मध्ये काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदूंवर आक्रमण केल्याने त्यांना तेथून पलायन करावे लागले आणि त्या वेळीच्या राजकारण्यांची आतंकवादाच्या विरोधात काहीच न केल्याने आतंकवाद्यांचे फावले.

४. काँग्रेस ६० वर्षे सत्तेवर होती; मात्र तिने आतंकवादाच्या विरोधात काहीच केले नाही. काँग्रेसने देशासाठी कार्य न केल्याने तिची आज दयनीय स्थिती झाली आहे; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आतंकवाद कदापि सहन करणार नाहीत.