जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक कठोर पावले उचलली आहेत. सिंधु जल करार रहित करण्यापासून भारतातील पाकिस्तानी नागरिकांना ‘व्हिसा’ (प्रवेश अनुमती) नाकारण्यापर्यंतचे अनेक निर्णय घेण्यात आले. आता त्याही पुढे जाऊन भारत सरकारने १६ पाकिस्तानी यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी आणली आहे. यामध्ये प्रमुख वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर यांच्या वाहिनीचाही समावेश आहे. या वाहिन्यांद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षायंत्रणा यांच्या विरोधात प्रक्षोभक माहिती पसरवल्याचा आरोप केला जात आहे. बंदी घातलेल्या यू ट्यूब वाहिन्यांमध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, ए.आर्.वाय. न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुना न्यूज यांसारख्या प्रमुख पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांचा समावेश आहे. गृह मंत्रालयाच्या शिफारसींवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या वाहिन्या चुकीची आणि खोटी माहिती, जातीय तणाव निर्माण करण्यासाठी सिद्ध केलेले लिखाण पसरवत असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणावरून भारताने ‘बीबीसी’ या आंतरराष्ट्रीय माध्यम समुहालाही फटकारले आहे. पहलगाम आक्रमण प्रकरणी त्यांच्या अहवालांवर सरकार देखरेख करणार आहे. वास्तविक वरील वृत्तवाहिन्या अनेक वर्षांपासून भारताच्या विरोधात विषारी प्रचार सर्वत्र करत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याच वेळी ही कारवाई करणे अपेक्षित होते. पहलगामची घटना घडल्यानंतर प्रशासन जागे झाले आणि त्याने ही कारवाई केली.
पाकवर आर्थिक बहिष्कार हवा !
पहलगाम आक्रमणाची घटना घडल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या २ देशांतील तणाव वाढला असतांनाच जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर काही ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने गोळीबार करून मूळ स्वभावाचे दर्शन पुन्हा घडवले आहे. पहलगाम आक्रमणाची घटना घडल्यानंतर भारताने जम्मू-काश्मीरमधील ९ आतंकवाद्यांची घरे सुरक्षादलांनी उद्ध्वस्त केली आहेत. ‘सार्क व्हिसा’च्या अंतर्गत भारतात आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना शोधून, मुदत संपण्यापूर्वी त्यांची मायदेशी रवानगी करण्यात येत आहे. भारताकडून काही ठिकाणी युद्ध सरावही चालू आहे. सिंधु जल करार रहित केल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला असून यामुळे पाकिस्तानला पाणी मिळणार नाही. साहजिकच पाकच्या लोकांची उपासमार होणार असल्याने पाकिस्तानही धास्तावला आहे. आता पाकिस्तानने अणूयुद्धांची धमकीही दिली आहे; मात्र या धमकीला भारताने भीक घातलेली नाही. बेडूक कितीही फुगला, तरी तो बैल होत नाही, त्याप्रमाणे पाकिस्तानने कितीही कांगावा केला, तरी जगातील चीन वगळता कोणताच देश पाकला साहाय्य करणार नाही. पाकिस्तानला वठणीवर आणायचे असेल, तर आर्थिक बहिष्कार आणि निर्यात बंदी हे मोठे हत्यार भारताकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच पाकिस्तानला बटाटा, कांदा, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तूंची निर्यात करणे थांबवल्यामुळे तेथे दूध आणि भाजीपाल्यांचे शुल्क गगनाला भिडले आहे. तेथील लोकांची उपासमार चालू झाली आहे. पुलवामा आक्रमणानंतर भारताने पाकमधून येणार्या मालावर २०० टक्के शुल्क लागू केल्यामुळे पाकचे कंबरडे मोडले होते. आता सिंधु नदीचे पाणी बंद केल्याने पाकिस्तानच्या शेतीची वाताहत होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आर्थिक बहिष्कार हे मोठे हत्यार आहे.
७० सहस्र लोकांना ठार मारले !

पाकिस्तानच्या स्थापनेपासूनच त्याने भारतात वारंवार घुसखोरी करून ठिकठिकाणी बाँबस्फोट घडवले. पोलीस आणि लष्करी सैनिकांसह असंख्य निष्पाप नागरिकांची हत्या केली. आतापर्यंत पाकिस्तानने पोसलेल्या आतंकवादी संघटनांनी जम्मू-काश्मीर येथे ७० सहस्र लोकांच्या हत्या केल्या आहेत. पाकच्या आतंकवादी कारवायांविषयी भारताने कितीही पुरावे दिले, तरी पाकिस्तानचे शेपूट नेहमी वाकडेच आहे. ‘पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांना पाठिंबा देणे, त्यांना प्रशिक्षण आणि निधी देणे हा आमचा प्रदीर्घ इतिहास आहे. गेल्या ३ दशकांपासून अमेरिकेसाठी हे घाणरेडे काम आम्ही करत आहोत’, अशी स्वीकृती पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनीच दिली. त्यामुळे पाकचे पितळ उघडे पडले आहे. ‘पाकिस्तानच्या भूमीत ३० ते ४० सहस्र आतंकवादी आहेत’, हे वर्ष २०१९ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या अमेरिका भेटीत मान्य केले होते. ‘पाकिस्तानमध्ये ‘नॉन स्टेट ॲक्टर्स’ आहेत आणि ते भारताविरोधी कृत्यांत सामील असतात’, अशी मान्यता पाकचे राष्ट्राध्यक्ष झरदारी यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या भूमीत ओसामा बिन लादेनलाही आसरा दिला होता. अमेरिकेच्या कळत अथवा नकळत पाकिस्तानने भारताच्या विरोधात कारस्थाने रचली आहेत. त्यामुळे उद्दाम पाकिस्तानची मस्ती जिरवण्याची आता वेळ आली आहे, यासह केंद्र सरकारलाही देशाचे आतंकवादविरोधी धोरण दाखवून देण्यासाठीही हीच योग्य वेळ आहे. रशिया, फ्रान्स, अमेरिका, इस्रायल, इटली, इजिप्त देश भारताच्या पाठीशी आहेत. जगातील कोणत्याही प्रतिष्ठित देशाने पाकिस्तानची बाजू घेतलेली नाही.
पाकला नकाशावरून नष्ट करा !
गेल्या काही वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील इतर देशांशी सौदार्हाचे संबंध प्रस्थापित केल्याने भारताचा जागतिक राजकारणावरील प्रभाव वाढला आहे. त्या तुलनेत पाकिस्तान कुणाच्या खिजगणतीतही नाही. पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये अशांतता आहे. सत्तेमधील पंजाबी वर्चस्वाविरुद्ध सिंध प्रांतात अप्रसन्नता आहे. तालिबान आणि पाकिस्तान यांचे संबंध विकोपाला गेले आहेत. पाकव्याप्त काश्मीरची तेथील सरकार उपेक्षा करत असल्याने तेथे अस्वस्थता आहे. इराणमधील हमास आतंकवादी संघटनेने इस्रायल देशातील १ सहस्र २५० ज्यू लोकांची अतिशय क्रौर्याने हत्या केली होती. त्यानंतर इस्रायलने कोणताही विचार न करता गाझापट्टीत केलेल्या आक्रमणात शेकडो आतंकवाद्यांना यमसदनी धाडले आहे. यातून इस्रायलचा बाणेदारपणा दिसून येतो. तशाच पद्धतीने भारताने पाकिस्तानवर आर्थिक बहिष्कारासह सशस्त्र आक्रमण करून त्याला जगाच्या नकाशावरून नष्ट करणे आवश्यक आहे, तरच देशातील आतंकवाद कायमचा संपेल.
भारताने पाकिस्तानवर आर्थिक बहिष्कारासह सशस्त्र आक्रमण करून त्याला जगाच्या नकाशावरून नष्ट करणे आवश्यक ! |