पहलगाम घटनेचा निषेध करणार्‍या हिंदूंना धमक्या देणार्‍यांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा ! – भाजपचे नेते किरीट सोमय्या

भाजपचे नेते किरीट सोमय्या

नालासोपारा – येथील ‘ऑरेंज हाईट्स’ या इमारतीच्या आवारात उघडपणे नमाजपठण केले जाते; परंतु तेथे हिंदूंना आरती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. इमारतीतील काही मुसलमानांनी तेथे अनधिकृत मशीद उभारून त्यावर भोंगे लावले आहेत. याविषयी मी आक्षेप घेतल्यावर पोलिसांनी भोंगे काढले. पहलगाम घटनेचा निषेध करणार्‍या हिंदूंना अडवून येथील मुसलमानांनी धमक्या दिल्या. पाकिस्तानचा झेंडा निदर्शकांकडून खेचून घेतला; मात्र पोलिसांनी याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही. अशा देशद्रोह्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे, अशी मागणी भाजपचे नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली. (‘नालासोपारा हिंदूबहुल महाराष्ट्रात आहे कि पाकिस्तानमध्ये ?’ असाच प्रश्न पडतो. हिंदूंचे अस्तित्व टिकवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अशी मागणी का करावी लागते ? पोलीस अशांविरुद्ध स्वतःहून गुन्हा का नोंदवत नाहीत ?

अनधिकृत मशीद उभारून भोंगे लावणार्‍यांचे समर्थन करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास वळवी यांच्यावर कारवाईची मागणी !

‘नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास वळवी यांनी मला त्या इमारतीत जाण्यापासून अडवले. मी आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी ‘केवळ दोघांना जाऊ देईन’, असे उद्धटपणाचे उत्तर दिले आणि त्यांच्या अधिकाराचा दुरुपयोग केला. इमारतीत अनधिकृत मशीद उभारून भोंगे लावणार्‍यांचे समर्थन आणि संरक्षण करणार्‍या, तसेच आमच्यासारख्या लोकांना तेथे जाण्यापासून प्रतिबंध करणार्‍या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास वळवी यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणीही सोमय्या यांनी या वेळी केली.

संपादकीय भूमिका

अशा पोलिसांना बडतर्फच करायला हवे !