८९ बेकायदेशीर बांधकामे पाडली
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – योगी आदित्यनाथ सरकारने भारत-नेपाळ सीमेवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली आहे. येथील भूमीवर अतिक्रमण करून बांधलेल्या ८९ इमारती पाडण्यात आल्या आहेत. नेपाळ सीमेवरील मदरशांवरही कारवाई करण्यात आली आहे. १७ मदरशांना टाळे ठोकण्यात आले आहे.
नेपाळच्या सीमेवर असलेल्या बहराइच, श्रावस्ती, बलरामपूर आणि लखीमपूर खेरी जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे बांधलेल्या मशिदीही ओळखल्या गेल्या आहेत. तसेच सिद्धार्थनगर जिल्ह्यात प्रशासनाला ५ ठिकाणी मशिदी आणि मदरसे यांचे अतिक्रमण आढळून आले आहे. लखीमपूर खेरी जिल्ह्यातील बेकायदेशीर नमाजपठण स्थळांवरही कारवाई करण्यात आली आहे.