काश्मीर आणि बंगाल येथे राष्ट्रपती राजवट लागू करा ! – हिंदु मक्कल कच्ची

कोइम्बतूर (तमिळनाडू) येथे संघटनेच्या वतीने आंदोलन

कोइम्बतूर (तमिळनाडू) – ‘हिंदु मक्कल कच्ची’च्या (‘हिंदु जनता पक्षा’च्या) वतीने तमिळनाडूमध्ये विविध ठिकाणी बंगालमध्ये वक्फ कायद्याच्या नावाखाली हिंदूंवर होणारे आक्रमण आणि काश्मीरमधील आतंकवादी आक्रमण यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. कोइम्बतूर येथे आंदोलनात सहभागी झाल्यानंतर बोलतांना ‘हिंदु मक्कल कच्ची’चे अध्यक्ष अर्जुन संपथ यांनी बंगालमध्ये वक्फ कायद्याच्या नावाखाली हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाचा निषेध केला. तसेच जम्मू-काश्मीरमधील आतंकवादी आक्रमणाचाही त्यांनी निषेध केला. बंगाल आणि काश्मीर या राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी केली. पाकिस्तानच्या विरोधात युद्ध घोषित करण्यात यावे आणि पाकव्याप्त काश्मीर भारतात समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी अर्जुन संपथ यांनी या वेळी केली. तमिळनाडू पोलिसांनी आंदोलन करणार्‍या ‘हिंदु मक्कल कच्ची’चे अध्यक्ष अर्जुन संपथ आणि इतर पदाधिकारी यांना अटक केली.

संपादकीय भूमिका 

वास्तविक अशा मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. सरकारने स्वतःहून अशी कृती करणे अपेक्षित आहे !