India-Pakistan Conflict : भारतासमवेत युद्ध करू नये !

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना त्यांचे भाऊ आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा सल्ला

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारताने पाकला धडा शिकवण्याचे घोषित केले आहे. पाकनेही भारताच्या आक्रमणाला ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्याची भाषा चालू केली आहे. या पार्श्वभूमीवर पाकचे माजी पंतप्रधान आणि आताचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे भाऊ नवाझ शरीफ यांनी त्यांना भारतासमवेत युद्ध न करण्याचा सल्ला दिल्याची माहिती समोर आली आहे. ‘भारताविरोधात युद्धाच्या दिशेने पाऊले टाकू नका, त्याऐवजी मुत्सद्दीपणे तणाव अल्प करण्यावर भर द्यावा’, असा सल्ला नवाझ शरीफ यांनी दिला आहे.

तुर्कीयेने पाकला दिले ड्रोन !

तुर्कीयेच्या वायूदलाचे मालवाहू विमान

भारताने भुकंपाच्या काळात मोठे साहाय्य केले असतांनाही तुर्कीयेने सध्याच्या परिस्थितीत पाकला पाठिंबा दिला आहे. भारताविरोधात लढण्यासाठी तुर्कीयेने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर शस्त्रसामुग्री पाठवली आहे. तुर्कीयेच्या वायूदलाचे मालवाहू विमान २७ एप्रिलला कराची विमानतळावर उतरले आहे. या विमानामध्ये तुर्कीयेचे ‘बायरकतार’ ड्रोन  आणि अन्य शस्त्रास्त्रे आहेत. तुकीर्येने एकूण ६ मालवाहू विमाने पाकिस्तानला पाठवली आहेत. ही विमाने इस्लामाबाद विमानतळावरही उतरवण्यात आली आहेत. (भारताला पाकविरोधात लढण्यासाठी अशा प्रकारचे साहाय्य करणारा एकतरी देश जगात आहे का ? – संपादक)

आतंकवाद्यांना साहाय्य करणार्‍या स्थानिक १५ काश्मिरी मुसलमानांची ओळख पटली

पहलगाम येथील आक्रमणामधील आतंकवाद्यांना स्थानिक काश्मिरी मुसलमानांनी साहाय्य केल्याचा संशय आहे. यातील १५ मुसलमानांची ओळख पटली आहे. (यांना पकडून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, तरच इतरांना वचक बसेल ! काश्मीरमधील आतंकवाद नष्ट न होण्यामागे तेथील जिहादी मानसिकतेचे मुसलमान उत्तरदायी आहेत. त्यांना विकास हवा आहे; मात्र हिंदू आणि भारताचा हस्तक्षेप नको आहे. यामुळेच हिंदूंचे तेथे पुनर्वसन होऊ शकलेले नाही. ही स्थिती हिंदु राष्ट्रात पालटण्यात येईल ! – संपादक) राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा त्यांचा शोध घेत आहे. या स्थानिक मुसलमानांनी आतंकवाद्यांना साहित्याची व्यवस्था करण्याव्यतिरिक्त पाकिस्तानकडून शस्त्रांस्त्रांचा साठाही मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. या १५ पैकी ३ जणांना अटक केली आहे. या आक्रमणाशी संबंध शोधण्यासाठी २०० हून अधिक मुसलमानांना चौकशीसाठी कह्यात घेण्यात आले आहे. आतंकवादी अजूनही पहलगामच्या घनदाट जंगलात लपून बसले असतील, असा संशय आहे.