भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बीबीसीला फटकारले !
नवी देहली – केंद्र सरकारने ब्रिटीश वृत्तसंस्था ‘बीबीसी’ला कडक शब्दांत फटकारले आहे. पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणानंतरही बीबीसी सतत इस्लामी आतंकवाद्यांना ‘मुजाहिद’ (जिहादसाठी लढणारा) म्हणत आहे. भारताने फटकारल्यानंतर बीबीसीने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
परराष्ट्र मंत्रालयाने पहलगाम आक्रमणाच्या वृत्तांकनावरून बीबीसीचे भारतातील प्रमुख जॅकी मार्टिन यांना एक पत्र लिहिले आहे. यात म्हटले आहे की, भविष्यात या प्रकरणावरील बीबीसीच्या वृत्तांकनावर आम्ही लक्ष ठेवू.
बीबीसी त्यांच्या हिंदी संकेतस्थळावरही ‘आतंकवादी’ लिहिण्याऐवजी ‘मुजाहिद’ लिहिते. तसेच बीबीच्या वृत्तांकनामध्ये सातत्याने काश्मीरचा उल्लेख ‘भारतीय प्रशासित काश्मीर’ असा केला जात आहे. जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे.
इतर परदेशी प्रसारमाध्यमांकडून हिंदुद्वेषी आणि आतंकवादप्रेमी वृत्तांकन
बीबीसी व्यतिरिक्त, इतर अनेक परदेशी प्रसारमाध्यमेदेखील सतत असाच प्रचार करत आहेत. कतारचे सरकारी माध्यम ‘अल् जझीरा’, पाकिस्तानचे ‘द डॉन’, अमेरिकेचे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ यांनी जिहादी आतंकवाद्यांचे ‘आतंकवादी’ ऐवजी ‘बंदूकधारी’ अशा प्रकारचे वर्णन केले आहे. त्यांनी पहलगाम आक्रमणातील अनेक माहिती लपवली होती. यात आतंकवाद्यांनी धर्माबद्दल विचारल्यानंतर हिंदूंच्या हत्या केल्याचाही उल्लेख केला नाही.
संपादकीय भूमिकाभारताने शब्दांचा मारा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी बीबीसीवर भारतात बंदीच घातली पाहिजे ! |