श्रीकृष्णच भक्तांचे आपत्काळी रक्षण करी ।

‘काही वर्षे हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाची सेवा श्रीकृष्णाने माझ्याकडून करवून घेतली. त्या वेळी बुद्धीप्रामाण्यवादी, पुरोगामी, हिंदुद्वेष्टे, धर्मांध, फुटीरतावादी इत्यादींची मानसिकता मला प्रसंगानुरूप कळली, तसेच माझे गुरुरूपी (परात्पर गुरु डॉ. आठवले) म्हणजेच जगद्गुरु श्रीकृष्णाने हिंदु धर्माची चैतन्यशक्ती आणि महानता दाखवली. त्यासाठी श्रीगुरुचरणी कवितारूपी कृतज्ञतापुष्प अर्पण करतो.’

पू. शिवाजी वटकर

बुद्धीप्रामाण्यवादी बुद्धीभेद करूनी,
नास्तिकतावादास खतपाणी घालती ।
श्रीकृष्णच (हिंदूंना) मन नि बुद्धी पलीकडे नेऊनी,
देव, धर्म नि राष्ट्राप्रती श्रद्धा वाढवी ।। १ ।।

पुरोगामी राजकारण करूनी,
अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करिती ।
श्रीकृष्णच धर्मशिक्षण देऊनी,
हिंदूंमध्ये धर्माभिमान जागृत करी ।। २ ।।

हिंदुद्वेष्टे देवतांचे विडंबन करूनी,
देवतांची अवहेलना करिती ।
श्रीकृष्णच क्षात्रतेज वाढवूनी,
हिंदुद्वेष्ट्यांचे निर्दालन करी ।। ३ ।।

धर्मांध मूर्तींचे भंजन करूनी,
आतंकवादाने धर्मांतरण करिती ।
श्रीकृष्णच चैतन्यशक्ती देऊनी,
हिंदु धर्माची पुनर्स्थापना करी ।। ४ ।।

फुटीरतावादी राष्ट्रद्रोह्यांशी संगनमत करूनी,
देशाचे तुकडे करण्याची वल्गना करिती ।
श्रीकृष्णच हिंदूसंघटन करूनी,
अखंड हिंदु राष्ट्र-स्थापनेचा संकल्प करी ।। ५ ।।

राष्ट्र नि धर्म विरोधी प्रदूषण करूनी,
नैसर्गिक आपत्तींना निमंत्रण देती ।
श्रीकृष्णच हिंदूंचा भक्तीभाव वाढवूनी,
प्रल्हादासम भक्तांचे आपत्काळी रक्षण करी ।। ६ ।।

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.