ईश्वरपूर (जिल्हा सांगली) – गुढीपाडव्यापासून ते हनुमान जयंतीपर्यंत पू. (श्रीमती) वैशाली मुंगळे आजी यांनी मनात ठरवले होते, त्याप्रमाणे १३ वेळा रामरक्षा, १३ वेळा हनुमान चालिसा आणि १३ वेळा मारुतीचे स्तोत्र असे प्रतिदिन म्हटले, तसेच हनुमान जयंतीच्या निमित्ताने त्यांनी १०० वेळा ‘हनुमान चालिसा’ म्हणण्याचा संकल्प आदल्या दिवशी केला होता. पू. मुंगळेआजी यांच्या चिकाटी आणि तळमळी या गुणांमुळे तो संकल्प हनुमान जयंतीच्या दिवशी पूर्ण केला. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज परिवार, सनातन परिवार आणि त्यांचे सर्व कुटुंबीय या सर्वांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी त्यांनी प्रार्थना केली. पू. मुंगळेआजी आजारी असल्याने त्यांच्या निवासस्थानी त्या झोपून आहेत. हे पठण पूर्ण करायला त्यांना रात्री ११.३० वाजले, तरी त्यांनी दूध आणि फलाहार घेऊन आधी ठरवल्याप्रमाणे केलेला संकल्प पूर्ण केला.