२२ एप्रिल २०२५ या दिवशी आतंकवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये हिंदूंना लक्ष्य केले. ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांना गोळ्या घालण्यात आल्या, त्यांनी स्वतः कॅमेर्यासमोर सांगितले की, आतंकवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून, त्यांना कलमा पढता येतो कि नाही, ते पाहून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या निर्घृण प्रकाराने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. या हत्यांमुळे ९० च्या दशकात काश्मिरी हिंदूंचे शिरकाण झाले, याच्या खपल्या उघड्या झाल्या आहेत.
३५ वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये असाच नरसंहार झाला होता. फरक एवढाच आहे की, आज काश्मीरला भेट देण्यासाठी गेलेल्या हिंदूंना लक्ष्य केले जात आहे आणि त्या वेळी स्थानिक हिंदूंना निवडकपणे मारले गेले. त्यामुळे काश्मीर खोर्यातील हिंदूंच्या वंशविच्छेदाचा ‘हा’ इतिहास विसरू नका !
हिंदूंच्या वंशविच्छेदाचा घटनाक्रम
१. हिंदूंच्या नरसंहाराचा प्रारंभ वर्ष १९८९ मध्ये झाला. खोर्यातील काश्मिरी हिंदूंचे सर्वांत मोठे आणि प्रिय नेते टीकालाल टपलू होते. १४ सप्टेंबर १९८९ या दिवशी एका लहान मुलीला शांत करण्यासाठी ते घराबाहेर पडले, तेव्हा आतंकवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार मारले. या आक्रमणात त्यांचे कुटुंब वाचले; कारण ते घटनेच्या एक आठवडा आधी देहलीला गेले होते.
२. दुसरा प्रसंग न्यायमूर्ती नीलकंठ गंजू यांचा आहे. ४ नोव्हेंबर १९८९ या दिवशी उच्च न्यायालयासमोर न्यायमूर्ती नीलकंठ गंजू यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. त्यांचा गुन्हा असा होता की, त्यांनी एका हत्येच्या बदल्यात आतंकवादी मकबूल भट्टला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. याचा सूड घेण्यासाठी न्यायमूर्ती नीलकंठ यांची हत्या करण्यात आली.
३. आतंकवाद्यांनी ज्यांना लक्ष्य केले होते, ते पुढचे नाव म्हणजे गिरिजा टिकू. त्या एका शाळेत काम करत होत्या आणि भीतीमुळे जम्मूमध्ये रहात होत्या. एके दिवशी त्यांना कळले की, परिस्थिती सामान्य झाली आहे; म्हणून त्या वेतन घेण्यासाठी बांदीपोराला परत गेल्या. आतंकवाद्यांनी त्यांना तिथेच पकडले. त्यांनी त्यांच्यावर बलात्कार केला आणि नंतर त्या जिवंत असतांना करवतीने त्यांच्या शरिराचे दोन तुकडे केले.
४. २२ मार्च १९९० या दिवशी अनंतनाग जिल्ह्यातील दुकानदार पी.एन्. कौल यांच्या संदर्भातही असाच क्रूरपणा करण्यात आला होता. असे म्हटले जाते की, पी.एन्. कौल जिवंत असतांना त्यांच्या शरिराची कातडी सोलून त्यांना मरणासन्न अवस्थेत सोडण्यात आले. ३ दिवसांनी त्याचा मृतदेह सापडला.
५. ७ मे १९९० या दिवशी प्राध्यापक गंजू आणि त्यांच्या पत्नीची आतंकवाद्यांनी हत्या केली. त्याआधी त्यांच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार झाला. आतंकवाद्यांपासून वाचण्यासाठी गंजू एका तांदळाच्या डब्यात शिरला. आतंकवाद्यांनी त्याला घरभर शोधले; पण तो कुठेही सापडला नाही. नंतर आतंकवादी निघून जात असतांना शेजार्यांनी तांदळाच्या एका पेटीकडे बोट दाखवले आणि आतंकवाद्यांनी त्यांना त्याच पेटीत गोळ्या घालून ठार मारले. नंतर त्याचे रक्त मिसळलेल्या तांदळाचा भात त्याच्या पत्नीला खायला देण्यात आला, हे दृश्य ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटातही दाखवले आहे.
६. पुढची कथा कृष्णा राजदान यांची आहे. १२ फेब्रुवारी १९९० या दिवशी बसमधून प्रवास करत असतांना कृष्णा यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह बसमधून बाहेर काढण्यात आला आणि लोकांना त्या मृतदेहाला लाथ मारण्यास सांगण्यात आले. ‘आतंकवादी हिंदूंचे काय करणार आहेत’, हे दाखवण्यासाठी त्यांच्या पार्थिवाची फरफट करण्यात आली.
७. २४ फेब्रुवारी या दिवशी अशोक कुमार यांच्या गुडघ्यात गोळी लागली. नंतर धर्मांध जिहाद्यांनी त्यांचे केस उपटले, त्यांच्यावर थुंकले आणि लघवी केली.
८. नवीन सप्रू यांचीही काश्मीर खोर्यात अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती. डोक्यात गोळी मारल्यानंतर त्यांचा मृतदेह जाळण्यात आला होता.
९. ३० एप्रिल या दिवशी काश्मिरी कवी सर्वानंद कौल आणि त्यांचा मुलगा वीरेंद्र कौल यांच्यावर क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्या. प्रारंभी त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर कट्टरपंथी त्यांना आणि त्यांच्या मुलाला समवेत घेऊन गेले. मग दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला. कपाळावरची त्वचा सोलून काढली गेली होती. सिगारेटचे चटके संपूर्ण शरीरभर दिसत होते. हाडे तुटली होती. डोळे काढले गेले होते. यानंतर त्यांच्यावर गोळीबारही करण्यात आला.
१०. आतंकवाद्यांनी प्रथम अशोक सुरी यांच्या भावाला सिगारेट चटके देऊन छळले आणि नंतर अशोक सुरीला मारायचे असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा भावाने अर्धमेल्या अवस्थेत असलेल्या भावाला काश्मीर सोडण्यास सांगितले, तेव्हा त्याने ऐकले नाही. परिणामी मध्यरात्री आतंकवादी घरात आले आणि धारदार शस्त्राने त्यांचा गळा कापून निघून गेले.
११. २६ जून १९९० या दिवशी बी.एल्. राणा त्यांच्या कुटुंबियांना आणायला जात असतांना त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या आधी त्यांचे वडील दामोदर यांची ३ जून या दिवशी आतंकवाद्यांनी हत्या केली होती.
१२. मुजू आणि इतर २ काश्मिरी पंडितांना इतकी क्रौर्य वागणूक देण्यात आली की, त्यांना प्रथम रक्तदान करण्याच्या बहाण्याने उचलण्यात आले. नंतर त्यांच्या शरिरातील सर्व रक्त काढल्यानंतर त्यांना वेदनेने तडफडून मरण्यासाठी सोडून देण्यात आले.
१३. सोपोर येथील चुन्नीलाल शल्ला यांनाही रक्तबंबाळ करून ठार मारण्यात आले. त्यांच्या दाढीमुळे आतंकवाद्यांना प्रारंभीला त्यांना ओळखता आले नाही. नंतर पोलीस निरीक्षक शल्ला यांच्या एका सहकारी हवालदाराने आतंकवाद्यांना बोलावले. शल्ला यांच्या गालांची कातडी सोलून त्यांना वेदनेने मरण्यासाठी सोडले.
१४. भूषणलाल रैना यांची २८ एप्रिल १९९० या दिवशी हत्या करण्यात आली. भूषणलाल त्यांच्या आईसह काश्मीर खोरे सोडणार होते. रात्री उशिरा दोघेही स्वतःचे सामान बांधत असतांना आतंकवादी आले आणि त्यांनी धारदार वस्तूने त्यांचे डोके भोसकले अन् त्यांना घराबाहेर ओढून नेले. नंतर त्यांना नग्न करण्यात आले आणि त्यांच्या शरिरात खिळे ठोकण्यात आले.
१५. वर्ष १९९८ मध्ये २३ काश्मिरी हिंदूंची हत्या करण्यात आली. खोर्यात हिंदु परत येण्याची शक्यता पडताळण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात ते होते. त्या सर्वांना एकाच आदेशाने रायफलीने मारण्यात आले, नंतर त्यांची मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली आणि त्यांच्या घरांना आग लावण्यात आली.
१६. काश्मिरी पंडितांना मारतांना अमित नावाचा एक तरुणही मारला गेला. आतंकवाद्यांनी त्याला मारण्याचा कोणताही कट रचला नव्हता. आतंकवादी बिट्टा याला लहानपणी शिकण्यासाठी पैसे दिलेल्या व्यक्तीला मारतांना रस्त्यात उभा असलेला हा २६ वर्षीय तरुणही मारला गेला.
१७. काश्मिरी पंडितांवरील अत्याचारांची कथा नुकतीच एका काश्मिरी महिलेने ‘ह्युमन्स ऑफ बाँबे’ या कार्यक्रमात सांगितली. त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या घरासमोरील भैरव मंदिर पाडण्यात आले आणि शेकडो लोकांसमोर एका तरुण बँक कर्मचार्याची हत्या करण्यात आली. जमावाने मृतदेहाला शेवटचा श्वास घेईपर्यंत मारहाण केली आणि त्या मृतदेहावर लघवीही केली.
१८. अशीच एक पीडित मंजू हिला भिंतीला लटकवून आतंकवाद्यांनी तिच्या संपूर्ण शरिराला स्पर्श केला. त्यानंतर मधुसूदन कौल होते, ज्यांना आतंकवाद्यांच्या गोळीमुळे आपल्या एका हाताचे बोट गमावावे लागले.
१९. पीडितांपैकी एकाने सांगितले की, त्याच्या वडिलांची हत्या करून त्यांचा मृतदेह विटांनी बांधून नदीत फेकण्यात आला.
२०. अनुराधा नावाच्या एका महिलेने तिच्या वेदना व्यक्त करतांना म्हटले होते, ‘कुणीही स्वतःच्या वडिलांना नग्न पाहिले नसेल; पण तिच्यावर ती वेळ आली होती. तिच्या वडिलांच्या शरिरात इतक्या गोळ्या झाडण्यात आल्या की, शवविच्छेदनानंतर मृतदेह नीट शिवताही आला नाही.’
२१. रवींद्र पंडित यांनी अलीकडेच सांगितले, ‘त्यांचे वडील सरकारी नोकरीमुळे काश्मीरमध्ये रहात होते आणि आतंकवाद्यांनी त्यांना त्यांच्याच बागेत नेऊन त्यांची हत्या केली. ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हटले नाही; म्हणून त्यांच्या शरिरात खिळे ठोकण्यात आले आणि काटेरी तारेचा फास बांधून त्यांना फाशी देण्यात आली.’
२२. ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी केलेल्या संशोधनाच्या वेळी अभिनेत्री पल्लवी जोशी यांना एका महिलेने सांगितले, ‘तिच्या वडिलांचे १५ तुकडे करण्यात आले आणि नंतर झेलम नदीत फेकण्यात आले.’
२३. सतीश कुमार टिकू यांनाही मारण्यात आले; कारण ते काश्मिरी पंडित होते, तसेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते; म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली.
२४. वर्ष २००३ मध्ये दक्षिण काश्मीरमधील पुलवामा भागातील नदीमार्ग नावाच्या गावात २४ काश्मिरी पंडितांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हे ते लोक होते, ज्यांनी ९० च्या दशकात स्वतःचे घर सोडण्यास नकार दिला होता. मृतांमध्ये ७० वर्षांची एक महिला आणि २ वर्षांचा एक निष्पाप मुलगा होता.
२५. वर्ष २०२२ मध्ये काश्मिरी पंडितांनाही लक्ष्य करण्यात आले. त्याच पद्धतीने शाळेत मुसलमानेतर शिक्षकांना निवडकपणे लक्ष्य करण्यात आले.
२६. वर्ष २०२४ मध्ये माखनलाल बिंद्रू यांचीही याच ठिकाणी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.
२७. त्याआधी अनंतनागमध्ये जिल्हा सरपंच अजय पंडिता यांची हत्या करण्यात आली होती.
(संदर्भ : विविध संकेतस्थळे)