
रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही. ‘सिंधु जल करार’ रोखण्याचा भारताचा निर्णय योग्यच आहे. ‘एअर स्ट्राईक’ किंवा ‘सर्जिकल स्ट्राईक’ यांपेक्षाही भारताचे जलास्त्र पाकला महागात पडणार. हा करार प्रारंभीपासूनच पाकिस्तानच्या पक्षात होता. आमच्या देशात धरण बांधण्यासाठी पाकिस्तानची अनुमती घ्यावी लागत होती. जम्मू-काश्मीरमधील किशनगंज जलविद्युत् प्रकल्पाला पाकचे अधिकारी पहाणीसाठी भेट देत होते. भारताला कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा या करारातून बाहेर पडण्यासाठी रोखू शकत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी रशिया, इराण यांच्यासह अनेक दशके चालणार्या आंतरराष्ट्रीय करारातून माघार घेतली. जर अमेरिका असे करू शकतो, तर भारत का करू शकत नाही ? (२४.४.२०२५)
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक, पुणे.