अरे, तू हिंदु आहेस !  

किती विपरित दुर्दशेप्रत अधोगती झाली आहे आमची ! आम्ही हिंदु आहोत, रामकृष्णादी, प्रताप-शिवाजी आदी नरश्रेष्ठ पूर्वजांचे वंशज आम्ही आहोत, हेच आपण विसरून गेलो आहोत आणि म्हणून ओरडून, आक्रोशून सांगावे लागते की, तू हिंदू, तू या भारतवर्षांचा राष्ट्रीय घटक. अशिक्षितांना कळत नाही; म्हणून त्यांची नोंद अहिंदूत, तर शिक्षणाच्या शिखरावर चढल्याने स्वतःलाच सारे कळते, अशा समजुतीने आणि विश्वबंधुत्वाच्या कल्पनेने वेडावलेले ‘हिंदु’ म्हणवून घ्यावयास सिद्ध नाहीत; म्हणून तेही अहिंदूच. मग राहिले कोण ? ही स्थिती पालटली पाहिजे. हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदूची नोंद ‘हिंदु’ म्हणूनच झाली पाहिजे. त्यासाठी आपले दैनंदिन व्यवहार सांभाळूनही आसपासच्या अज्ञानी लोकांना हे समजावून देणे प्रत्येक हिंदूला शक्य नाही का ? हिंदु राष्ट्राचे भवितव्य आजच्या कोटी कोटी हिंदूंनीच घडवावयाचे आहे, हे विसरून चालणार नाही. कर्तव्याची जाणीव असलेल्या हिंदुमात्राला केवढे तरी कार्य करता येईल; पण तळमळ हवी. मग कार्यसिद्धी हात जोडून उभीच आहे. (साभार : ग्रंथ ‘अज्ञाताची वचने,’ संचालक : अमरेंद्र गाडगीळ)