नवी देहली – पहलगाम आतंकवादी आक्रमणामुळे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ब्राझिलमध्ये पुढील आठवड्यात होणार्या ‘ब्रिक्स’च्या (ब्राझिल, रशिया, भारत, दक्षिण आफ्रिका आणि चीन या देशांचा समूह) बैठकीला जाण्याचे रहित केले आहे.